शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अंकुर साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सत्कार : शेतकºयांच्या समस्यांवर साहित्यिक मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.अंकुर साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेतर्फे ५६ वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन पार पडले. समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. विचारमंचावर माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, प्रा. रमाकांत कोलते, वसंतराव घुईखेडकर, अरविंद तायडे, प्रवीण देशमुख, अण्णाभाऊ डांगे, अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारचे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीसुद्धा आपल्या यवतमाळनगरीमध्ये व्हावे, अशी भावना अध्यक्षीय भाषणातून माणिकराव ठाकरे यांनी बोलून दाखविली. वर्तमान परिस्थितीत शिक्षणाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यातच शासन इंग्रजी शाळांना मान्यता देत असल्यामुळे मातृभाषेची गळचेपी होत आहे, अशी खंत प्रा. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केली. मराठी भाषा जगली पाहिजे ही भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. प्रा. वसंतराव पुरके यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रेक्षकांची दाद मिळविली. आपण आज ज्या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत, त्यात साहित्याचाच मोलाचा वाटा आहे, असे पुरके म्हणाले.यावेळी विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरवचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने संमेलन यशस्वी झाले, त्या खडसे दाम्पत्याचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते मनोज्ञ सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना सुनिल खडसे आणि विद्याताई खडसे हे दाम्पत्य गलबलून गेले होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या संमेलनाचा मुख्य गाभा हा शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित होता. परिसंवाद, कविसंमेलन, गझलमुशायरा आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचे प्रतिबिंब उमटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चावरे व प्रा. ताराचंद कंठाळे यांनी केले. तर आभार शहारे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी मनोहर शहारे, महेश अडगुलवार, सुरेश राऊत, सुरेश गांजरे, प्रा. महेश मोकडे, सुवर्णा ठाकरे, नितीन धोटे, दत्ता चांदोरे या अंकुरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.व्यंगचित्रांचे प्रदर्शनसाहित्य संमेलनस्थळी यवतमाळ येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरेश राऊत यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कवी, साहित्यिक, चित्रकार आदींवर आधारित हे व्यंगचित्र होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि संमेलनाच्या दोन दिवसपर्यंत नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सुरेश राऊत यांनी या व्यंगचित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली.