शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अंकुर साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सत्कार : शेतकºयांच्या समस्यांवर साहित्यिक मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.अंकुर साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेतर्फे ५६ वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन पार पडले. समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. विचारमंचावर माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, प्रा. रमाकांत कोलते, वसंतराव घुईखेडकर, अरविंद तायडे, प्रवीण देशमुख, अण्णाभाऊ डांगे, अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारचे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीसुद्धा आपल्या यवतमाळनगरीमध्ये व्हावे, अशी भावना अध्यक्षीय भाषणातून माणिकराव ठाकरे यांनी बोलून दाखविली. वर्तमान परिस्थितीत शिक्षणाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यातच शासन इंग्रजी शाळांना मान्यता देत असल्यामुळे मातृभाषेची गळचेपी होत आहे, अशी खंत प्रा. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केली. मराठी भाषा जगली पाहिजे ही भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. प्रा. वसंतराव पुरके यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रेक्षकांची दाद मिळविली. आपण आज ज्या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत, त्यात साहित्याचाच मोलाचा वाटा आहे, असे पुरके म्हणाले.यावेळी विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरवचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने संमेलन यशस्वी झाले, त्या खडसे दाम्पत्याचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते मनोज्ञ सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना सुनिल खडसे आणि विद्याताई खडसे हे दाम्पत्य गलबलून गेले होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या संमेलनाचा मुख्य गाभा हा शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित होता. परिसंवाद, कविसंमेलन, गझलमुशायरा आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचे प्रतिबिंब उमटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चावरे व प्रा. ताराचंद कंठाळे यांनी केले. तर आभार शहारे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी मनोहर शहारे, महेश अडगुलवार, सुरेश राऊत, सुरेश गांजरे, प्रा. महेश मोकडे, सुवर्णा ठाकरे, नितीन धोटे, दत्ता चांदोरे या अंकुरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.व्यंगचित्रांचे प्रदर्शनसाहित्य संमेलनस्थळी यवतमाळ येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरेश राऊत यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कवी, साहित्यिक, चित्रकार आदींवर आधारित हे व्यंगचित्र होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि संमेलनाच्या दोन दिवसपर्यंत नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सुरेश राऊत यांनी या व्यंगचित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली.