शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

अंकुर साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.

ठळक मुद्देमान्यवरांचा सत्कार : शेतकºयांच्या समस्यांवर साहित्यिक मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.अंकुर साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेतर्फे ५६ वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन पार पडले. समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. विचारमंचावर माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, प्रा. रमाकांत कोलते, वसंतराव घुईखेडकर, अरविंद तायडे, प्रवीण देशमुख, अण्णाभाऊ डांगे, अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारचे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीसुद्धा आपल्या यवतमाळनगरीमध्ये व्हावे, अशी भावना अध्यक्षीय भाषणातून माणिकराव ठाकरे यांनी बोलून दाखविली. वर्तमान परिस्थितीत शिक्षणाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यातच शासन इंग्रजी शाळांना मान्यता देत असल्यामुळे मातृभाषेची गळचेपी होत आहे, अशी खंत प्रा. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केली. मराठी भाषा जगली पाहिजे ही भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. प्रा. वसंतराव पुरके यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रेक्षकांची दाद मिळविली. आपण आज ज्या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत, त्यात साहित्याचाच मोलाचा वाटा आहे, असे पुरके म्हणाले.यावेळी विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरवचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने संमेलन यशस्वी झाले, त्या खडसे दाम्पत्याचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते मनोज्ञ सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना सुनिल खडसे आणि विद्याताई खडसे हे दाम्पत्य गलबलून गेले होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या संमेलनाचा मुख्य गाभा हा शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित होता. परिसंवाद, कविसंमेलन, गझलमुशायरा आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचे प्रतिबिंब उमटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चावरे व प्रा. ताराचंद कंठाळे यांनी केले. तर आभार शहारे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी मनोहर शहारे, महेश अडगुलवार, सुरेश राऊत, सुरेश गांजरे, प्रा. महेश मोकडे, सुवर्णा ठाकरे, नितीन धोटे, दत्ता चांदोरे या अंकुरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.व्यंगचित्रांचे प्रदर्शनसाहित्य संमेलनस्थळी यवतमाळ येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरेश राऊत यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कवी, साहित्यिक, चित्रकार आदींवर आधारित हे व्यंगचित्र होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि संमेलनाच्या दोन दिवसपर्यंत नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सुरेश राऊत यांनी या व्यंगचित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली.