शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

जनावरांची पाण्यासाठी भटकंती झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST

पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच ...

पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट

पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरेनामुळे दक्षता घेतली जात आहे.

अवैध वृक्षतोडीमुळे जंगल होताहेत भकास

उमरखेड : तालुक्यात काही जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. अनेक जंगले भकास होत आहे. वनविभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. होळीमुळे वृक्षतोडीला जोर आला आहे.

रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे नागरिकांना यातना

दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघात घडत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बिटरगाव परिसरात चिमुकले कामावर

बिटरगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना काम करावे लागते. आता पालकांसह चिमुकली मुलेही कामावर जात असल्याचे परिसरात दिसून येत आहे. अनेक रस्ता कामांवर चिमुकले खडी फोडताना दिसत आहे. त्यांचे बालपण कोमेजत आहे.

घाटंजी तालुक्यातून जनावरांची तस्करी

घाटंजी : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पारवा पोलिसांनी ही तस्करी उघड केली. अनेक जनावरांची सुटका केली. मात्र, अद्यापही तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

आर्णी तालुक्यात पेटल्या हातभट्ट्या

आर्णी : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या पेटल्या आहेत. पाेलसांनी यापूर्वी विविध ठिकाणी धाड टाकून मोहामाच, सडवा जप्त केला होता. विक्रेत्यांना अटकही केली होती. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी हातभट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दारव्हा तालुक्यात उद्योगांची वानवा

दारव्हा : तालुक्यात मोठ्या उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे बेरोजगारांना कामाच्या शोधात महानगरांकडे धाव घ्यावी लागते. बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, ओलिताअभावी आता शेती कसणेही अवघड झाले आहे.

लोणबेहळ शिवारात शेतकऱ्यांचे हाल

लोणबेहळ : गेल्या सप्ताहात परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. हातचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप पिकांनी आधीच दगा दिला होता. आता रबीतील पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.