शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

जनावरांची पाण्यासाठी भटकंती झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST

पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच ...

पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट

पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरेनामुळे दक्षता घेतली जात आहे.

अवैध वृक्षतोडीमुळे जंगल होताहेत भकास

उमरखेड : तालुक्यात काही जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. अनेक जंगले भकास होत आहे. वनविभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. होळीमुळे वृक्षतोडीला जोर आला आहे.

रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे नागरिकांना यातना

दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघात घडत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बिटरगाव परिसरात चिमुकले कामावर

बिटरगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना काम करावे लागते. आता पालकांसह चिमुकली मुलेही कामावर जात असल्याचे परिसरात दिसून येत आहे. अनेक रस्ता कामांवर चिमुकले खडी फोडताना दिसत आहे. त्यांचे बालपण कोमेजत आहे.

घाटंजी तालुक्यातून जनावरांची तस्करी

घाटंजी : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पारवा पोलिसांनी ही तस्करी उघड केली. अनेक जनावरांची सुटका केली. मात्र, अद्यापही तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

आर्णी तालुक्यात पेटल्या हातभट्ट्या

आर्णी : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या पेटल्या आहेत. पाेलसांनी यापूर्वी विविध ठिकाणी धाड टाकून मोहामाच, सडवा जप्त केला होता. विक्रेत्यांना अटकही केली होती. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी हातभट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दारव्हा तालुक्यात उद्योगांची वानवा

दारव्हा : तालुक्यात मोठ्या उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे बेरोजगारांना कामाच्या शोधात महानगरांकडे धाव घ्यावी लागते. बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, ओलिताअभावी आता शेती कसणेही अवघड झाले आहे.

लोणबेहळ शिवारात शेतकऱ्यांचे हाल

लोणबेहळ : गेल्या सप्ताहात परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. हातचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप पिकांनी आधीच दगा दिला होता. आता रबीतील पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.