शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची पाण्यासाठी भटकंती झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST

पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच ...

पुसद तालुक्यात होळीवर कोरोनाचे सावट

पुसद : तालुक्यात होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जागृत झाले आहे. नागरिकांना घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरेनामुळे दक्षता घेतली जात आहे.

अवैध वृक्षतोडीमुळे जंगल होताहेत भकास

उमरखेड : तालुक्यात काही जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. अनेक जंगले भकास होत आहे. वनविभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. होळीमुळे वृक्षतोडीला जोर आला आहे.

रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे नागरिकांना यातना

दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघात घडत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बिटरगाव परिसरात चिमुकले कामावर

बिटरगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना काम करावे लागते. आता पालकांसह चिमुकली मुलेही कामावर जात असल्याचे परिसरात दिसून येत आहे. अनेक रस्ता कामांवर चिमुकले खडी फोडताना दिसत आहे. त्यांचे बालपण कोमेजत आहे.

घाटंजी तालुक्यातून जनावरांची तस्करी

घाटंजी : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पारवा पोलिसांनी ही तस्करी उघड केली. अनेक जनावरांची सुटका केली. मात्र, अद्यापही तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

आर्णी तालुक्यात पेटल्या हातभट्ट्या

आर्णी : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या पेटल्या आहेत. पाेलसांनी यापूर्वी विविध ठिकाणी धाड टाकून मोहामाच, सडवा जप्त केला होता. विक्रेत्यांना अटकही केली होती. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी हातभट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दारव्हा तालुक्यात उद्योगांची वानवा

दारव्हा : तालुक्यात मोठ्या उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे बेरोजगारांना कामाच्या शोधात महानगरांकडे धाव घ्यावी लागते. बहुतांश जनता शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, ओलिताअभावी आता शेती कसणेही अवघड झाले आहे.

लोणबेहळ शिवारात शेतकऱ्यांचे हाल

लोणबेहळ : गेल्या सप्ताहात परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. हातचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप पिकांनी आधीच दगा दिला होता. आता रबीतील पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.