शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:52 IST

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे ...

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार

फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंच-उपसरपंचाच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार मंगळवारी घडला.

गेल्या काही दिवसांपासून फुलसावंगी ग्रामपंचायत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. गावातील काही नागरिक मंगळवारी ग्रामपंचायतमध्ये तक्रारी घेऊन आले असता त्यांच्या तक्रारी ऐकून न घेता उपसरपंच व इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप करण्यात आला.

गाव नमुना आठ व मृत्यू नोंदी अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तसेच त्यांची कामे वेळेत होऊ दिली जात नाहीत असाही आरोप करण्यात आला. तसेच येथील ग्रामपंचायतमध्ये काही सत्ताधारी सदस्यांकडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, तुमची कामे कशी होतात हे आम्ही बघून घेऊ, असा उघड दम दिला जात आहे.

या सर्व समस्या सांगण्यासाठी जेव्हा गावातील नागरिक ग्रामपंचायतमध्ये आले, त्यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण न करता उपसरपंचासह इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप विजय महाजन यांनी केला. यावेळी विजय महाजन, अनुप नाईक, अमर दळवे, नसीर खान, समशेर लाला, योगेश वाजपेय, याकूब लाला, आरिफ लाला, शेख मजर, संदीप साखरे, शशिकांत नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.