शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:52 IST

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे ...

सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार

फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सरपंच-उपसरपंचाच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार मंगळवारी घडला.

गेल्या काही दिवसांपासून फुलसावंगी ग्रामपंचायत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. गावातील काही नागरिक मंगळवारी ग्रामपंचायतमध्ये तक्रारी घेऊन आले असता त्यांच्या तक्रारी ऐकून न घेता उपसरपंच व इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप करण्यात आला.

गाव नमुना आठ व मृत्यू नोंदी अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तसेच त्यांची कामे वेळेत होऊ दिली जात नाहीत असाही आरोप करण्यात आला. तसेच येथील ग्रामपंचायतमध्ये काही सत्ताधारी सदस्यांकडून सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, तुमची कामे कशी होतात हे आम्ही बघून घेऊ, असा उघड दम दिला जात आहे.

या सर्व समस्या सांगण्यासाठी जेव्हा गावातील नागरिक ग्रामपंचायतमध्ये आले, त्यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण न करता उपसरपंचासह इतर सदस्य निघून गेल्याचा आरोप विजय महाजन यांनी केला. यावेळी विजय महाजन, अनुप नाईक, अमर दळवे, नसीर खान, समशेर लाला, योगेश वाजपेय, याकूब लाला, आरिफ लाला, शेख मजर, संदीप साखरे, शशिकांत नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.