शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

नॅशनल हायवेच्या संथगतीने महागाव तालुक्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

फोटोसंजय भगत महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत ...

फोटोसंजय भगत

महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत एक कंपनी व महागावपासून नांदेडपर्यंत दुसरी कंपनी चौपदरीकरणाचे काम करीत आहे. कामाच्या संथगतीने तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

महागाव ते नांदेडच्या कामातील संथगती आणि अनियमितता नागरिकांच्या जिवावर उठलेली आहे. रस्ते अपघात नित्याची बाब झाली आहे. रस्त्यावरील अडथळे आणि नित्याचे अपघात केंद्र सरकारविरुद्ध असंतोषाचे कारण बनले आहे. महागाव ते नागपूरपर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झाले. केवळ हिवरा, लोणबेहळ व अन्य काही ठिकाणी जमीन अधिग्रहण वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. तत्कालीन प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे यांनी अल्पावधीत आपल्या कार्यकुशलतेमुळे हा रस्ता पूर्णत्त्वाला नेला आहे.

रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे, अपवादवगळता पुलावर नसलेले ट्यूबलेवल, दिशादर्शक फलक, गावाच्या मराठी नावावरून हिंदी नावाचे लागलेले फलक गावाची ओळख बदलून टाकण्यास कारणीभूत ठरले आहेत. नॅशनल हायवेवर होत असलेले अतिक्रमण, रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्याकरिता पर्यायी जागा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तत्कालीन प्रकल्प संचालकांच्या बदलीनंतर विद्यमान प्रकल्प संचालकांनी या रस्त्यावरील अर्धवट कामावर अद्याप लक्ष केंद्रित केलेले दिसत नाही. १०० टक्के काम पूर्ण होण्याआधीच भांब राजा येथे टोल नाका सुरू करण्यात आला.

महागाव ते नांदेड हा रस्ता तर अपघाताला निमंत्रण देत आहे. दरम्यान, संबंधित कंपनीच्या मालक भागीदाराचे निधन झाल्यामुळे कामात कमालीची शिथिलता आली आहे. या ९० किलोमीटरमध्ये बहुतांश फुलांचे काम अर्धवट आहे. पर्यायी मजबूत वळण रस्ते नसल्यामुळे वाहतुकीला त्रास होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने अपघात घडत आहेत. मात्र, जखमींना जवळच्या दवाखान्यात नेण्याची सोय किंवा रस्त्यात अपघातग्रस्त झालेले वाहन बाजूला करण्याची सुविधा नाही. अपघातग्रस्त वाहन कित्येक दिवस नॅशनल हायवेवर पडून असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

बॉक्स

चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार

रस्त्याच्या अर्धवट आणि सदोष कामामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. केंद्र सरकारविरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी या कामाबद्दल ‘ब्र’ शब्द काढत नाहीत. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. एकीकडे रस्ते विकासावरून केंद्र सरकारची प्रतिमा उजळ होत असताना लोंबकळत पडलेल्या कामामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.

कोट

मध्यंतरी कंपनी मालकाचे निधन झाल्यामुळे कामात संथगती आली. काही आर्थिक प्रश्न उद्भवले होते. अधिकारी, कर्मचारी कंपनी सोडून गेले. आता काम नियमित सुरू झाले. ७० टक्के काम पूर्ण झाले. तीन महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होईल. वळण रस्ते तत्काळ दुरुस्त केले जातील.

सुनील पाटील, प्रकल्प संचालक नॅशनल हायवे, नांदेड.