शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नॅशनल हायवेच्या संथगतीने महागाव तालुक्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

फोटोसंजय भगत महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत ...

फोटोसंजय भगत

महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत एक कंपनी व महागावपासून नांदेडपर्यंत दुसरी कंपनी चौपदरीकरणाचे काम करीत आहे. कामाच्या संथगतीने तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

महागाव ते नांदेडच्या कामातील संथगती आणि अनियमितता नागरिकांच्या जिवावर उठलेली आहे. रस्ते अपघात नित्याची बाब झाली आहे. रस्त्यावरील अडथळे आणि नित्याचे अपघात केंद्र सरकारविरुद्ध असंतोषाचे कारण बनले आहे. महागाव ते नागपूरपर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झाले. केवळ हिवरा, लोणबेहळ व अन्य काही ठिकाणी जमीन अधिग्रहण वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. तत्कालीन प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे यांनी अल्पावधीत आपल्या कार्यकुशलतेमुळे हा रस्ता पूर्णत्त्वाला नेला आहे.

रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे, अपवादवगळता पुलावर नसलेले ट्यूबलेवल, दिशादर्शक फलक, गावाच्या मराठी नावावरून हिंदी नावाचे लागलेले फलक गावाची ओळख बदलून टाकण्यास कारणीभूत ठरले आहेत. नॅशनल हायवेवर होत असलेले अतिक्रमण, रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्याकरिता पर्यायी जागा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तत्कालीन प्रकल्प संचालकांच्या बदलीनंतर विद्यमान प्रकल्प संचालकांनी या रस्त्यावरील अर्धवट कामावर अद्याप लक्ष केंद्रित केलेले दिसत नाही. १०० टक्के काम पूर्ण होण्याआधीच भांब राजा येथे टोल नाका सुरू करण्यात आला.

महागाव ते नांदेड हा रस्ता तर अपघाताला निमंत्रण देत आहे. दरम्यान, संबंधित कंपनीच्या मालक भागीदाराचे निधन झाल्यामुळे कामात कमालीची शिथिलता आली आहे. या ९० किलोमीटरमध्ये बहुतांश फुलांचे काम अर्धवट आहे. पर्यायी मजबूत वळण रस्ते नसल्यामुळे वाहतुकीला त्रास होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने अपघात घडत आहेत. मात्र, जखमींना जवळच्या दवाखान्यात नेण्याची सोय किंवा रस्त्यात अपघातग्रस्त झालेले वाहन बाजूला करण्याची सुविधा नाही. अपघातग्रस्त वाहन कित्येक दिवस नॅशनल हायवेवर पडून असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

बॉक्स

चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार

रस्त्याच्या अर्धवट आणि सदोष कामामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. केंद्र सरकारविरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी या कामाबद्दल ‘ब्र’ शब्द काढत नाहीत. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. एकीकडे रस्ते विकासावरून केंद्र सरकारची प्रतिमा उजळ होत असताना लोंबकळत पडलेल्या कामामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.

कोट

मध्यंतरी कंपनी मालकाचे निधन झाल्यामुळे कामात संथगती आली. काही आर्थिक प्रश्न उद्भवले होते. अधिकारी, कर्मचारी कंपनी सोडून गेले. आता काम नियमित सुरू झाले. ७० टक्के काम पूर्ण झाले. तीन महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होईल. वळण रस्ते तत्काळ दुरुस्त केले जातील.

सुनील पाटील, प्रकल्प संचालक नॅशनल हायवे, नांदेड.