शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

अंधरवाडी अद्याप अंधारातच

By admin | Updated: November 27, 2014 23:43 IST

पाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला

नीलेश यमसनवार - पाटणबोरीपाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही साधा रस्ता मिळाला नाही.पाटणबोरी येथून पश्चिमेस साडे तीन किलोमीटर अंतरावरील १०० टक्के आदिवासी व गोरगरीब बांधव वास्तव्य करणाऱ्या अंधरवाडीत ५० घरांची वस्ती आहे. त्यात २७५ ते ३00 ग्रामस्थ वास्तव्य करतात. या गावाला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. निसर्गाच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. मात्र विकासाचा सूर्य या गावात अद्याप पोहोचलाच नाही. विकासाची किरणे कधी उगवलीच नाही. स्वातंत्र्याच्या तब्बल ६७ वर्षानंतरही या इवलाशा गावाला साधा रस्ता नाही़ परिणामी तेथील गावकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करीत जीवन कंठावे लागत आहे. या गावाला धड रस्ता नसल्याने पावसाळ्यात तर ग्रामस्थ भंडावून जातात. त्यांची प्रचंड तारांबळ उडते. विशेषत: पावसाळ्यात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यापर्यंत तरी नेता येईल किंवा नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकतो. कारण पावसाळ्यात या गावाला असलेल्या सध्याच्या रस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल साचतो. तो चिखल तुडवित ग्रामस्थांना पुढची वाट शोधावी लागते. त्यामुळे त्यांची प्रचंड परवड होते. तथापि या गावाला रस्ता तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर उदासीनताच दाखविली जाते. या छोटाश्या गावात केवळ रस्ताच नाही, तर शाळाही नाही, पाणी पुरवठा योजनाही नाही. सर्वच बाबतीत हे गाव मागासलेले आहे. आदिवासी बांधवांसाठी शासन विविध योजना आखते. त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देते. प्रत्यक्षात हा निधी, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे या गावावरून दिसून येते. परिणामी हा निधी, योजना कुठे जातात, असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे त्यांनाही वाटते. या लहान गावाकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थ अद्यापही गावात विकासाचा सूर्य कधी उगवेल, याच विवंचनेत आहे. शासनाने किमान रस्ता द्यावा, गावात शुद्ध पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, एवढ्याच त्यांच्या माफक अपेक्षा आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही कोणत्याच शासनाला त्या पूर्ण करता आल्या नाहीत. विशेष म्हणजे केळापूर-आर्णी हा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असताना गावाची फरफट सुरूच आहे.