शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

आनंदवाडीच्या महिलांची पाण्यासाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:18 IST

यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देदीड किलोमीटरची पायपीट : सरपंच, सचिवांच्या दुर्लक्षामुळे संताप

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.आनंदवाङी येथे १०० टक्के पारधी बांधवांची वस्ती आहे. मात्र या गावाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे सध्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आनंदवाङीच्या महिलांना गावाबहेरून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. गावात नळयोजनेव्दारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र गेल्या ८ दिवसांपासून नळयोजनेच्या विहिरीवरील ङीपी जळाल्यामुळे गावात पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे गावालगतच्या दीड किलोमीटर अंतरावरील शेतातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.काही दिवसांपूर्वी महसूल राज्यमंत्री संजय राठोङ यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी पाणीटंचाईबाबत हयगय ऐकली जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा इशाराही गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आता आनंदवाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.