शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आनंदनगर झाले महिलांच्या निर्धारातून आनंदी

By admin | Updated: October 26, 2014 22:46 IST

गावाचे नाव आनंदनगर. मात्र गावात दारुचा महापूर. दररोज गावात भांडण-तंटे. रस्त्यावर झिंगणारे दारूडे. चार वर्षांपूर्वी गावाचे असे चित्र होते. मात्र दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या एका महिलेने

विजय बोंपीलवार - हिवरासंगमगावाचे नाव आनंदनगर. मात्र गावात दारुचा महापूर. दररोज गावात भांडण-तंटे. रस्त्यावर झिंगणारे दारूडे. चार वर्षांपूर्वी गावाचे असे चित्र होते. मात्र दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या एका महिलेने पुढाकार घेतला. गावातील महिलांच्या सहकार्याने अख्खे गाव दारूपासून मुक्त केले. आनंदनगर महिलांच्या निर्धारातून आनंदी झाले. चार वर्षापूर्वी दारूत झिंगणारे आता हरिपाठात दंग होऊ लागले. महागाव तालुक्यातील आनंदनगर हे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. काही वर्षापूर्वी नावाप्रमाणेच गाव आनंदी होते. परंतु या गावात दारू शिरली. व्यसनांनी अनेकांना आपल्या कवेत घेतले. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण दारूमध्ये झिंगू लागले. दारूसोबतच गांजा, मटका, जुगार अड्डेही सुरू झाले. छोट्याशा गावात ७० ते ८० दारू भट्ट्या सुरू होत्या. आजूबाजूच्या गावातील दारूडेही या गावात यायचे. दारूमुळे गावात घरोघरी भांडणे, रस्त्यावर झिंगून पडलेले दारूडे असे दृश्य असायचे. या सर्वांचा त्रास महिलांना असायचा. दारूचा अतिरेक झाला. गावातील दत्तात्रय जामकर या सात्विक स्वभावाच्या तरुणाला दारूने सोडले नाही. अतिमद्यसेवनात त्याचा मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील दिलीप जामकरनेही दारूच्या नशेत स्वत:ला संपविले. दिलीपचा भाऊ रमेशचाही दारूच्या आहारी जाऊन अपघाती मृत्यू झाला. तिघांच्या मरणाने हसते खेळते कुटुंब उघड्यावर आले. रमेश व दिलीपच्या पत्नीला तरुण पणातच वैध्वय आले. मात्र परिस्थितीवर खचून न जाता दिलीपची पत्नी बेबीताईने गावातून दारू हद्दपार करण्याचा निर्धार घेतला. गल्लोगल्लीत असलेल्या दारूड्यांपुढे एकटी महिला काय करणार असा सर्व गावाला प्रश्न पडला. परंतु तिने हार मानली नाही. गाव दारूमुक्त व्हावे म्हणून महिला मंडळ स्थापन करण्याचे ठरविले. गावातील प्रतिष्ठीतांच्या भेटी घेतल्या. आपला मनोदय सांगितला. त्यानंतर गावातील व्यसनाधीन पतीच्या बायकांना एकत्र केले. महिलांचे जगदंबा मंडळ स्थापन केले. महागाव पोलिसांना याबाबीची माहिती दिली. पोलिसांनीही त्यांना साथ दिली. पोलिसांनी दारू भट्ट्यांवर धाडी टाकणे सुरू केले. दारूड्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले. आता या गावात दारूचा थेंबही मिळत नाही. काही दारूडे बाहेरगावहून गुपचुप दारू पिऊन येतात. परंतु रस्त्यावर कोणताच धिंगाना दिसत नाही. दारू हद्दपार झाल्याने महिलांचे मनोबल वाढले. त्यांनी गावात हनुमान मंदिर स्थापन्याचा निर्णय घेतला. नागपूरवरून हनुमानाची मूर्ती आणून प्रतिष्ठापणा केली. या मंदिरात दररोज सायंकाळी हरिपाठ होतो. दररोज गावातील २५ ते ३० लोक हरिपाठाला हजर असतात. यासाठी त्यांना विलास कवाणे, सो.फू.राठोड, मंगल कारभारी, दत्तराव पवार, पंडित पवार, काशीराम राठोड, भगवान पवार, सीताराम आडे, रोडूसिंग राठोड, अमोल जामकर, सतवाराव जाधव यांनी सहकार्य केले.