शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतील ३८ बोगस ट्रक पासिंगचा तपास अमरावतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:00 IST

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) यवतमाळ शाखेकडे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांच्या फाईली गोळा झाल्याने तपासासाठी

सीआयडी : पुसदमधील सीसीआय रुईगाठी घोटाळा अकोल्याकडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) यवतमाळ शाखेकडे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांच्या फाईली गोळा झाल्याने तपासासाठी अखेर शेजारील जिल्ह्यांची मदत घेतली जात आहे. ३८ ट्रकच्या बोगस पासिंगचा तपास अमरावतीकडे तर पुसदमधील सीसीआयच्या रुईगाठी घोटाळ्याचा तपास अकोल्याच्या सीआयडी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. यवतमाळ सीआयडीमधील उपअधीक्षक सोमेश्वर खाटपे आजारी रजेवर आहेत. पोलीस निरीक्षक चव्हाण काही महिन्यांपासून सीआयडीची धुरा सांभाळत आहे. यवतमाळात सीआयडीकडे सुमारे डझनभर गुन्हे तपासाला आहे. यातील बहुतांश गुन्हे चार ते पाच वर्षांच्या पूर्वीची आहेत. आरटीओमधील ३८ ट्रकच्या बोगस पासिंग घोटाळ्याचे प्रकरण तर चक्क दशक लोटूनही अद्याप तपासातच आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या अमरावतीच्या एका सीआयडी अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला आहे. असेच एक प्रकरण पुसद येथील सीसीआयच्या (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) रूईगाठी घोटाळ्याचे आहे. या प्रकरणालाही जवळजवळ दशक होत आहे. मात्र अद्याप सोक्षमोक्ष लागलेला नाही. अकोल्याच्या सीआयडी अधिकाऱ्याकडे हे प्रकरण तपासाला देण्यात आले आहे. दिग्रसमधील वकील विरुद्ध तत्कालीन ठाणेदाराचे प्रकरणही सीआयडीकडे आहे. यवतमाळातील आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे आधीच पुण्याकडे वर्ग करण्यात आली. तर दोन-तीन गुन्हे शेजारील जिल्ह्यात देण्यात आले. त्यानंतरही दहा गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे कायम आहे.सीआयडीकडे वर्षानुवर्षे तपासाच्या नावाखाली गुन्हे प्रलंबित ठेवले जातात. गेली काही वर्ष ‘तपासाला पुरेसे अधिकारीच नाही’ या एकमेव कारणाआड सीआयडीची निष्क्रीयता दडपली जात होती. परंतु सध्या सीआयडीमध्ये बऱ्यापैकी अधिकारी उपलब्ध झाले आहेत. त्यानंतरही सीआयडीतील गुन्ह्यांच्या तपासाची संथगती कायम आहे. पोलीस ठाणे बरे म्हणण्याची वेळ सीआयडीसारख्या महत्वाच्या एजंसीमध्ये गुन्ह्यांच्या तपासाची ही गती असेल तर न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण होतो आहे. तपासाची ही कासवगती पाहता सीआयडीपेक्षा पोलीस ठाणे बरे, असे म्हणण्याची वेळ न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संबंधितांवर आली आहे.सीआयडीची सर्वत्रच वाताहत केंद्रात सीबीआय आणि राज्यात सीआयडी अशी तपास यंत्रणांची रचना आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी तत्काळ सीआयडीला सोपविली जातात. त्यासाठी स्थायी आदेश आहे. जिल्हा पोलिसांकडील राज्यस्तरावर गाजलेल्या प्रकरणांचा तपास सीआयडीकडे सोपविला जातो. प्रकरण स्थानिक पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे लक्षात येताच सखोल तपास होऊन संबंधितांना तातडीने न्याय मिळण्याच्या प्रामाणिक उद्देशाने ते सीआयडीकडे सोपविले जाते. परंतु सीआयडीकडील तपासाची कासवगती पाहता तेथून न्याय मिळण्याची अपेक्षा भंग पावते. सीआयडीच्या नावानेच केवळ फुगा फुगल्याचे पहायला मिळते. प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळेच आहे.