शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साथीतही हापकीनचे औषध आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:31 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासुद्धा औषधी पुरवठा केला नाही.

ठळक मुद्देकंपनीला दीड कोटींच्या औषधीचा विसर : एमआरआय मशिनचे १३ कोटी अडकले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासुद्धा औषधी पुरवठा केला नाही.संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. या रोगाला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पातळीवरून औषधांची खरेदी के ली जात आहे. या व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधांचा पुरवठा करण्याची जबाबदारी हापकीन महामंडळाला देण्यात आली होती. वर्षभराच्या औषधांचा करारही केला. मात्र प्रत्यक्षात ही औषधी वैद्यकीय महाविद्यालयाला पाठविलीच गेली नाही. राज्यभरातच ही स्थिती असल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसतो आहेत.जिल्ह्यामध्ये अपघातग्रस्तांचे निदान करताना एमआरआय मशीन महत्वाची आहे. त्याची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे. त्याकरिता साडेतेरा कोटी रूपयांचा निधी हापकीन महामंडळाकडे वळता करण्यात आला. यानंतरही हापकीनने वैद्यकीय महाविद्यालयाला एमआरआय मशीन पाठविलीच नाही. यामुळे जिल्ह्यातील रूग्णांना उपचारासाठी दुसºया जिल्ह्यावरच विसंबून रहावे लागत आहे. हापकीनकडून औषधी पुरवठा न होण्यामागील नेमकी कारणे काय? हे अस्पष्ट आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.जिल्ह्यात डायरियाचे १३४३ रुग्णजिल्ह्यात एप्रिलपासून डायरियाचे रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात भरती होत आहे. दरमहिन्यालाच डायरीचे रूग्ण दाखल होत आहे. आतापर्यंत १३४३ रूग्णावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. कॉलराचे ११० रूग्ण भरती करण्यात आले. तर ३१ आॅगस्टपासून स्क्रब टायफसचे ५४ रूग्ण आणि सप्टेंबरपासून डेंग्यूचे ६४ रूग्ण दाखल झाले आहेत.फवारणी विषबाधितांचा आकडा पोहोचला १४० वरजुलैपासून फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांचा आकडा १४० वर पोहोचला आहे. यातील दोन विषबाधित रूग्ण सध्या उपचार घेत असून इतरांना उपचाराअंती सुटी देण्यात आली.साथरोगाचे मोठे आक्रमण झाले आहे. या साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी करण्यात आली. साथरोग नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा पूर्णत: प्रयत्न करीत आहे.- मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय