शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

साथरोग बळावण्याचा धोका वाढला

By admin | Updated: August 9, 2015 00:06 IST

पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला आहे.

‘हिवताप’वर ताण वाढला : जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सर्वेक्षणात चालढकल होण्याची भीती यवतमाळ : पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने साथरोगाच्या रुग्णांचे परिणामकारक सर्वेक्षण होण्याविषयी साशंकता आहे. यामुळे या आजाराचे रुग्ण बळावण्याचा धोका वाढला आहे. शासनस्तरावरून या विभागाकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब ठरली आहे.पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाढणारा डासांचा प्रादूर्भाव आणि दुर्गंधी ही बाब जलजन्य आजारास कारणीभूत ठरणारी आहे. मलेरिया, डायरिया यासह डेंग्यूसारखे गंभीर आजार मोठ्या प्रमाणात फैलावण्याची भीती आहे. हा आजार होऊ नये यासाठी जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी हिवताप निर्मूलन विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. आस्थापना विभाग ते प्रत्यक्ष गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाणवा या विभागात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक आदी ठिकाणी सेवा देण्यासाठी हिवताप विभागाकडे आवश्यक तेवढे कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. आरोग्य सहायकाचे ४८ पदे मंजूर आहेत. यातील १८ पदे अजूनही रिक्त आहेत. आरोग्य कर्मचारी १८० मंजूर असताना प्रत्यक्ष १२० कार्यरत आहेत. ६० रिक्त पदे भरण्याची प्रतीक्षा आहे. याशिवाय आस्थापना विभागालाही हिवताप चढला आहे. या विभागातील रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती गोळा करणे, वरिष्ठांंना माहिती सादर करणे, साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून घेणे याबाबी रखडल्या जात आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. जागोजागी गटार तयार झाली आहे. सांडपाणी अडल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. या परिस्थितीत हिवताप विभागाच्या यंत्रणेपुढे साथरोग नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे. (वार्ताहर)