शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

साथरोग बळावण्याचा धोका वाढला

By admin | Updated: August 9, 2015 00:06 IST

पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला आहे.

‘हिवताप’वर ताण वाढला : जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सर्वेक्षणात चालढकल होण्याची भीती यवतमाळ : पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने साथरोगाच्या रुग्णांचे परिणामकारक सर्वेक्षण होण्याविषयी साशंकता आहे. यामुळे या आजाराचे रुग्ण बळावण्याचा धोका वाढला आहे. शासनस्तरावरून या विभागाकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब ठरली आहे.पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाढणारा डासांचा प्रादूर्भाव आणि दुर्गंधी ही बाब जलजन्य आजारास कारणीभूत ठरणारी आहे. मलेरिया, डायरिया यासह डेंग्यूसारखे गंभीर आजार मोठ्या प्रमाणात फैलावण्याची भीती आहे. हा आजार होऊ नये यासाठी जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी हिवताप निर्मूलन विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. आस्थापना विभाग ते प्रत्यक्ष गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाणवा या विभागात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक आदी ठिकाणी सेवा देण्यासाठी हिवताप विभागाकडे आवश्यक तेवढे कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. आरोग्य सहायकाचे ४८ पदे मंजूर आहेत. यातील १८ पदे अजूनही रिक्त आहेत. आरोग्य कर्मचारी १८० मंजूर असताना प्रत्यक्ष १२० कार्यरत आहेत. ६० रिक्त पदे भरण्याची प्रतीक्षा आहे. याशिवाय आस्थापना विभागालाही हिवताप चढला आहे. या विभागातील रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती गोळा करणे, वरिष्ठांंना माहिती सादर करणे, साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून घेणे याबाबी रखडल्या जात आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. जागोजागी गटार तयार झाली आहे. सांडपाणी अडल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. या परिस्थितीत हिवताप विभागाच्या यंत्रणेपुढे साथरोग नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे. (वार्ताहर)