शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

जिल्हा परिषदेत सत्ताधारी-विरोधकांची युती

By admin | Updated: May 10, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेच्या दहाही विषय समितींच्या सदस्यांची मंगळवारी अविरोध निवड करण्यात आली.

विषय समिती निवडणूक : ८३ सदस्यांची बिनविरोध निवड लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या दहाही विषय समितींच्या सदस्यांची मंगळवारी अविरोध निवड करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांची छुपी युती उघड झाली आहे. जिल्हा परिषदेत १० विषय समितींच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात प्रत्येक समितीसाठी निश्चित सदस्य संख्येएवढेच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व समितींची अविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष माधुरी आडे यांनी घोषित केले. ‘लोकमत’ने यापूर्वीच जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांची छुपी युती झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. समिती सदस्यांची एकमताने निवड होणार असल्याचे भाकीतही वर्तविले होते. ते मंगळवारी तंतोतंत खरे ठरले. स्थायी समितीसाठी सर्वाधिक चुरस होती. मात्र आज आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यात पंकज मुडे, जयश्री पोटे, मंगला पावडे, बाळा पाटील, प्रकाश राठोड, श्रीधर मोहोड, गजानन बेजंकीवार व राम देवसरकर यांचा समावेश आहे. बांधकाम समितीवर विजय राठोड, गजानन उघडे, निखिल जैत, कविता इंगळे, सुरचिता पाटील, अमेय नाईक, रेणूताई शिंदे आणि चित्तरंजन कोल्हे यांची वर्णी लागली. काँग्रेसच्या स्वाती येेंडे यांना वित्त आणि शिक्षण या दोन समितींवर घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहपालकमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड यांनाही बांधकामसह समाजकल्याण समितीवर घेण्यात आले. कृषी समितीवर १०, समाजकल्याण समितीवर १० आणि पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, अर्थ, महिला व बालकल्याण समितीवर प्रत्येकी आठ, तर जलव्यवस्थापन समितीवर सहा सदस्यांची निवड झाली. काँग्रेसचा गटनेता बदलणार ? काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांची स्थायी समितीवर वर्णी लागली. सुरुवातीला अध्यक्ष पदाच्या व नंतर स्थायी समिती सदस्याच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या स्वाती येंडे यांच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडली. स्थायी समितीतही संधी मिळू न शकल्याने आता काँग्रेस त्यांना गटनेतेपद देणार असल्याची चर्चा आहे. परंतु राम देवसरकर यांनी ही बाब नाकारली. विरोधक नरमले की काय ? विषय समिती सदस्य निवडीत जवळपास प्रत्येक समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन सदस्यांना संधी मिळाली. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे आहे. मात्र तरीही त्यांना कोणत्याच समितीवर जादा सदस्य निवडून आणणे शक्य झाले नाही. उलट सत्ताधारी व विरोधकांनी मिळून प्रत्येक समितीचे सदस्यत्त्व वाटून घेतले. त्यामुळे विरोधक नरमले की काय, अशी चर्चा आहे. यातूनच सत्ताधारी आणि विरोधकांची युती उजागर झाल्याचे बोलले जात आहे.