शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

जिल्हा परिषद सभेत युती सरकारचा निषेध

By admin | Updated: January 21, 2016 02:11 IST

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन गावे मदतीस पात्र ठरविली. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला.

यवतमाळ : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन गावे मदतीस पात्र ठरविली. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर भाजपा-सेनेने त्याला विरोध दर्शविला. भाजपा-सेना युती सरकारच्या निषेधाचा ठराव काँग्रेसचे देवानंद पवार यांनी मांडला. त्याला राष्ट्रवादीचे प्रवीण देशमुख यांनी अनुमोदन दिले. यावेळी शिवसेनेचे आशिष कुळसंगे आणि भाजपाचे अमन गावंडे यांनी तीव्र विरोध केला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहोड यांनी असा ठराव घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावर सदस्यांनी आक्षेप नोंदवित लोकशाहीत असा कुठलाच कायदा नसल्याचे सांगितले. यातून वातावरण अधिकच तापले. यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांच्या भावना राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. या सभेमध्ये अन्य विषयांवरही चर्चा झाली. या सभेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेमहाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव घेण्यात आला. काही विषयांवर बैठकीत खडाजंगीही झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, हा विषय सेनेचे सदस्य आशिष कुळसंगे यांनी सभागृहात मांडला. या ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली.करंजी ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र मानगी हे कोलाम जमातीचे असूनही ग्रामसेवक भरतीत ज्येष्ठतेनुसार त्यांचा विचार झाला नसल्याचा मुद्दा प्राजक्ता मानकर यांनी मांडला. डिजिटल शाळा, बिंदू नामावलीनुसार शिक्षक पदभरतीचा विषय मांडण्यात आला. यासोबतच संग्राम केंद्राचे संगणक आणि त्याची प्रणाली साशंक असल्याचा मुद्दा अमोल राठोड यांनी मांडला. दारव्हा तालुक्यातील चाणी प्रमाणे इतर संग्राम केंद्राची स्थिती वाईट असल्याच्या विषयावरही सभागृहात चर्चा झाली. (शहर वार्ताहर)