शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्हा परिषद सभेत युती सरकारचा निषेध

By admin | Updated: January 21, 2016 02:11 IST

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन गावे मदतीस पात्र ठरविली. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला.

यवतमाळ : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन गावे मदतीस पात्र ठरविली. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर भाजपा-सेनेने त्याला विरोध दर्शविला. भाजपा-सेना युती सरकारच्या निषेधाचा ठराव काँग्रेसचे देवानंद पवार यांनी मांडला. त्याला राष्ट्रवादीचे प्रवीण देशमुख यांनी अनुमोदन दिले. यावेळी शिवसेनेचे आशिष कुळसंगे आणि भाजपाचे अमन गावंडे यांनी तीव्र विरोध केला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहोड यांनी असा ठराव घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावर सदस्यांनी आक्षेप नोंदवित लोकशाहीत असा कुठलाच कायदा नसल्याचे सांगितले. यातून वातावरण अधिकच तापले. यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांच्या भावना राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. या सभेमध्ये अन्य विषयांवरही चर्चा झाली. या सभेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेमहाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव घेण्यात आला. काही विषयांवर बैठकीत खडाजंगीही झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, हा विषय सेनेचे सदस्य आशिष कुळसंगे यांनी सभागृहात मांडला. या ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली.करंजी ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र मानगी हे कोलाम जमातीचे असूनही ग्रामसेवक भरतीत ज्येष्ठतेनुसार त्यांचा विचार झाला नसल्याचा मुद्दा प्राजक्ता मानकर यांनी मांडला. डिजिटल शाळा, बिंदू नामावलीनुसार शिक्षक पदभरतीचा विषय मांडण्यात आला. यासोबतच संग्राम केंद्राचे संगणक आणि त्याची प्रणाली साशंक असल्याचा मुद्दा अमोल राठोड यांनी मांडला. दारव्हा तालुक्यातील चाणी प्रमाणे इतर संग्राम केंद्राची स्थिती वाईट असल्याच्या विषयावरही सभागृहात चर्चा झाली. (शहर वार्ताहर)