शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

पाच नगरपंचायतींवर युतीचा झेंडा

By admin | Updated: November 28, 2015 03:17 IST

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीपैकी पाच ठिकाणी भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला असून महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीने सत्ता स्थापन केली.

महागावात परिवर्तन : काँग्रेस-राष्ट्रवादीचे समीकरण जुळलेच नाही, बाभूळगावात सात जागा असूनही अपयशयवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीपैकी पाच ठिकाणी भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला असून महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर आलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीला येथेही सत्तेचे समीकरण जुळविताच आले नाही. नगरपंचायत निवडणूकीत आजी - आमदारांनी प्रचाराचा धुराळा उडवून चूरस निर्माण केली होती. वचपा काढण्याची मनिषा घेऊन काँग्रेस - राष्ट्रवादीच्या दिग्गाजांनी सुध्दा गल्लीबोळीत दौरे करण्यास सुरूवात केली. याचा फायदाही झाला. काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीकडे अधिक संख्याबळ आले. मात्र सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर त्यांच्याकडे नव्हती. बाभुळगाव मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सात नगरसेवक, राष्ट्रवादीचे एक सदस्य आणि अपक्षाची मदत घेऊनही बहुमत गाठता आले नाही. भाजप- सेना युतीने अपक्ष कोमल अंकीत खंते यांना पाठिंबा देत अध्यक्षपदी विराजमान केले. तर शिवसेनेच्या रवींद्र रामचंद्र काळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या सोनाली तातेड आणि चंद्रशेखर सूर्यभान परचाके यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. सात सदस्यांचे संख्याबळ असूनही काँग्रेस नेत्यांना बाभुळगावात सत्तास्थापनेसाठी दोन सदस्यांचे समर्थन मिळविता आले नाही. कळंब नगरपंचायतीवर शिवसेना पाच, भाजप चार, राष्ट्रवादी तीन, अपक्ष एक यांनी मिळून नगराध्यक्ष म्हणून शिवसेनचे दिगांबर मस्के, उपाध्यक्षपदी भाजपचे मनोज काळे यांनी निवड केली. काँग्रेसचे फारूक सिद्दीकी आणि राजू पड्डा यांना प्रत्येकी चार मते मिळाली. राळेगाव नगरपंचायतीत भाजपकाडे स्पष्ट बहुमत असल्याने घोषणेची औपचारिकताच करण्यात आली. नगराध्यक्ष म्हणून बबन रामभाऊ भोंगारे यांनी अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचे अ‍ॅड़ प्रफुल चव्हाण ११ मतांनी विजयी झाले तर काँग्रेस समर्थीत अपक्ष सदस्य शशिकांत धुमाळ यांना पाच मते मिळाली. महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीकडेच बहुमत असल्याने सुनील नारायण नरवाडे यांची अध्यक्ष म्हणून तर उदय नरवाडे यांनी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मारेगाव मध्ये शिवसेना - भाजप युतीने विरोधकांचे मनसुबे उधळत आपले संख्याबळ कायम ठेवल्याने शिवसेनेच्या नगराध्यक्ष इंदू दिनेश किन्हेकार आणि उपाध्यक्ष प्रशांत नांदे यांनी प्रत्येकी नऊ मते घेऊन विजय प्राप्त केला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या जीजाबाई वरारकर आणि अपक्ष खालीद पटेल यांनी प्रत्येकी आठ मते घेतली. झरी येथे भाजपच्या मंदा कवडू सिडाम यांनी नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. शिवसेनेच्या ज्योती संजय विजगुनवार उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विजयी झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी समर्थीत निर्मला कोडापे आणि नंदकिशोर किनाके यांना प्रत्येकी सात मते मिळाली. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस समर्थीत उमेदवाराला संख्याबळ जुळविताच आले नाही. बहुमताचा मॅजिक फिगर एक आणि दोन अंकानेच मिस झाल्याचे दिसून येते. राजकीय मुसद्देगिरी कमी पडल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत असूनही काही ठिकाणी सत्तास्थापनेची संधी गमवावी लागली. या निकालामुळे या दोन्ही पक्षातील नैराश्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सहा ठिकाणी ढोलतशाच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूक काढली. पहिल्यांदाच नगराध्यक्ष विराजमान होत असल्याने प्रत्येक ठिकाणी उत्सुकता दिसत होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निकालानंतर आत जयपराजयाचे कवित्व सुरू झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)