शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाच नगरपंचायतींवर युतीचा झेंडा

By admin | Updated: November 28, 2015 03:17 IST

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीपैकी पाच ठिकाणी भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला असून महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीने सत्ता स्थापन केली.

महागावात परिवर्तन : काँग्रेस-राष्ट्रवादीचे समीकरण जुळलेच नाही, बाभूळगावात सात जागा असूनही अपयशयवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीपैकी पाच ठिकाणी भाजप- शिवसेना युतीने आपला झेंडा रोवला असून महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर आलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीला येथेही सत्तेचे समीकरण जुळविताच आले नाही. नगरपंचायत निवडणूकीत आजी - आमदारांनी प्रचाराचा धुराळा उडवून चूरस निर्माण केली होती. वचपा काढण्याची मनिषा घेऊन काँग्रेस - राष्ट्रवादीच्या दिग्गाजांनी सुध्दा गल्लीबोळीत दौरे करण्यास सुरूवात केली. याचा फायदाही झाला. काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीकडे अधिक संख्याबळ आले. मात्र सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर त्यांच्याकडे नव्हती. बाभुळगाव मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सात नगरसेवक, राष्ट्रवादीचे एक सदस्य आणि अपक्षाची मदत घेऊनही बहुमत गाठता आले नाही. भाजप- सेना युतीने अपक्ष कोमल अंकीत खंते यांना पाठिंबा देत अध्यक्षपदी विराजमान केले. तर शिवसेनेच्या रवींद्र रामचंद्र काळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या सोनाली तातेड आणि चंद्रशेखर सूर्यभान परचाके यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. सात सदस्यांचे संख्याबळ असूनही काँग्रेस नेत्यांना बाभुळगावात सत्तास्थापनेसाठी दोन सदस्यांचे समर्थन मिळविता आले नाही. कळंब नगरपंचायतीवर शिवसेना पाच, भाजप चार, राष्ट्रवादी तीन, अपक्ष एक यांनी मिळून नगराध्यक्ष म्हणून शिवसेनचे दिगांबर मस्के, उपाध्यक्षपदी भाजपचे मनोज काळे यांनी निवड केली. काँग्रेसचे फारूक सिद्दीकी आणि राजू पड्डा यांना प्रत्येकी चार मते मिळाली. राळेगाव नगरपंचायतीत भाजपकाडे स्पष्ट बहुमत असल्याने घोषणेची औपचारिकताच करण्यात आली. नगराध्यक्ष म्हणून बबन रामभाऊ भोंगारे यांनी अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचे अ‍ॅड़ प्रफुल चव्हाण ११ मतांनी विजयी झाले तर काँग्रेस समर्थीत अपक्ष सदस्य शशिकांत धुमाळ यांना पाच मते मिळाली. महागाव येथे परिवर्तन नगर विकास आघाडीकडेच बहुमत असल्याने सुनील नारायण नरवाडे यांची अध्यक्ष म्हणून तर उदय नरवाडे यांनी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मारेगाव मध्ये शिवसेना - भाजप युतीने विरोधकांचे मनसुबे उधळत आपले संख्याबळ कायम ठेवल्याने शिवसेनेच्या नगराध्यक्ष इंदू दिनेश किन्हेकार आणि उपाध्यक्ष प्रशांत नांदे यांनी प्रत्येकी नऊ मते घेऊन विजय प्राप्त केला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या जीजाबाई वरारकर आणि अपक्ष खालीद पटेल यांनी प्रत्येकी आठ मते घेतली. झरी येथे भाजपच्या मंदा कवडू सिडाम यांनी नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. शिवसेनेच्या ज्योती संजय विजगुनवार उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विजयी झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी समर्थीत निर्मला कोडापे आणि नंदकिशोर किनाके यांना प्रत्येकी सात मते मिळाली. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस समर्थीत उमेदवाराला संख्याबळ जुळविताच आले नाही. बहुमताचा मॅजिक फिगर एक आणि दोन अंकानेच मिस झाल्याचे दिसून येते. राजकीय मुसद्देगिरी कमी पडल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत असूनही काही ठिकाणी सत्तास्थापनेची संधी गमवावी लागली. या निकालामुळे या दोन्ही पक्षातील नैराश्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सहा ठिकाणी ढोलतशाच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूक काढली. पहिल्यांदाच नगराध्यक्ष विराजमान होत असल्याने प्रत्येक ठिकाणी उत्सुकता दिसत होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निकालानंतर आत जयपराजयाचे कवित्व सुरू झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)