शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

आर्णी-सावळी रस्त्याच्या कामात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

By admin | Updated: April 23, 2017 02:31 IST

आर्णी-सावळी रस्त्याच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी

अभियंत्यांविरुद्ध तक्रार : संरक्षक भिंत न बांधताच हडपले १८ लाख यवतमाळ : आर्णी-सावळी रस्त्याच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि आर्णी पोलीस ठाण्यात सेंटर फॉर अवेअरनेस, जस्टिस अँन्ड ह्युमन राईटस्चे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी तक्रार केली आहे. परंतु महिना उलटूनही आर्णी पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही. रस्ते विकास योजना २००१ ते २०२१ अंतर्गत विशेषत: आदिवासी व नक्षलग्रस्त भागात बांधलेल्या जिल्हा व तालुका जोडणाऱ्या आणि आंध्रप्रदेश महाराष्ट्र राज्यातील वाणिज्यिक हालचालींना चालना मिळून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या उदात्त हेतुने हा रस्ता बांधण्यात आला आहे. प्रती किमी ४० लाख रुपये प्रमाणे नऊ कोटी रुपये खर्च करून २२ किमीच्या रस्त्याची अवघ्या ९० दिवसातच दुरावस्था होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी विशेष प्रकल्प बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम तक्रार दाखल करून समिती गठित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आॅगस्ट २०१६ मध्ये समिती गठित करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून सप्टेंबरमध्ये अहवाल सादर केला. क्षतिग्रस्त कारपेट सिलकोट व अत्यंत क्षतिग्रस्त झालेला रस्ता आणि ४७५ ऐवजी २८० मि. मि. चा टाकलेला अत्यल्प खडीचा थर आदी बाबींसह अनेक भ्रष्ट बाबी अहवालातून उघड झाल्या. प्रकरणी डॉ. राऊत यांनी बांधकाम उपविभाग आर्णीचे उपविभागीय अभियंता एस. एस. श्रावगी, शाखा अभियंता आर. एस. गिरनाळे आणि कंत्राटदार असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीविरुद्ध जिल्हाधिकारी आणि आर्र्र्र्र्णी पोलीस ठाण्यात १३ आरोपांची गंभीर तक्रार केली. सदर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने आमदार राजू तोडसाम यांनी आॅगस्ट १६ मध्ये अमरावती विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करून सात आॅगस्टला याच रस्त्यावर तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनात आणून सबंधितांवर फौजदारीची मागणी केली आहे, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कंत्राटदारावर कारवाई आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती झाल्याशिवाय देयक अदा करू नये, अशा सूचना केल्या आहेत. शासनाच्या मानकानुसार काम न झाल्याने व डांबरीकरणासंदर्भात शासनाने २००८ मध्ये केलेल्या तरतुदींचा सबंधितांनी भंग केल्याने संगणमताने झालेल्या या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)