शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी-सावळी रस्त्याच्या कामात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

By admin | Updated: April 23, 2017 02:31 IST

आर्णी-सावळी रस्त्याच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी

अभियंत्यांविरुद्ध तक्रार : संरक्षक भिंत न बांधताच हडपले १८ लाख यवतमाळ : आर्णी-सावळी रस्त्याच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि आर्णी पोलीस ठाण्यात सेंटर फॉर अवेअरनेस, जस्टिस अँन्ड ह्युमन राईटस्चे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी तक्रार केली आहे. परंतु महिना उलटूनही आर्णी पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही. रस्ते विकास योजना २००१ ते २०२१ अंतर्गत विशेषत: आदिवासी व नक्षलग्रस्त भागात बांधलेल्या जिल्हा व तालुका जोडणाऱ्या आणि आंध्रप्रदेश महाराष्ट्र राज्यातील वाणिज्यिक हालचालींना चालना मिळून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या उदात्त हेतुने हा रस्ता बांधण्यात आला आहे. प्रती किमी ४० लाख रुपये प्रमाणे नऊ कोटी रुपये खर्च करून २२ किमीच्या रस्त्याची अवघ्या ९० दिवसातच दुरावस्था होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी विशेष प्रकल्प बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम तक्रार दाखल करून समिती गठित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आॅगस्ट २०१६ मध्ये समिती गठित करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून सप्टेंबरमध्ये अहवाल सादर केला. क्षतिग्रस्त कारपेट सिलकोट व अत्यंत क्षतिग्रस्त झालेला रस्ता आणि ४७५ ऐवजी २८० मि. मि. चा टाकलेला अत्यल्प खडीचा थर आदी बाबींसह अनेक भ्रष्ट बाबी अहवालातून उघड झाल्या. प्रकरणी डॉ. राऊत यांनी बांधकाम उपविभाग आर्णीचे उपविभागीय अभियंता एस. एस. श्रावगी, शाखा अभियंता आर. एस. गिरनाळे आणि कंत्राटदार असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीविरुद्ध जिल्हाधिकारी आणि आर्र्र्र्र्णी पोलीस ठाण्यात १३ आरोपांची गंभीर तक्रार केली. सदर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने आमदार राजू तोडसाम यांनी आॅगस्ट १६ मध्ये अमरावती विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करून सात आॅगस्टला याच रस्त्यावर तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनात आणून सबंधितांवर फौजदारीची मागणी केली आहे, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कंत्राटदारावर कारवाई आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती झाल्याशिवाय देयक अदा करू नये, अशा सूचना केल्या आहेत. शासनाच्या मानकानुसार काम न झाल्याने व डांबरीकरणासंदर्भात शासनाने २००८ मध्ये केलेल्या तरतुदींचा सबंधितांनी भंग केल्याने संगणमताने झालेल्या या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)