शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

पंचरंगी लढतीने लागणार सर्वांचा कस

By admin | Updated: October 4, 2014 23:34 IST

वणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या

विनोद ताजने - वणीवणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे गणित मतदारांपुढे मांडत आहे़ निवडणूक जाणकार मात्र अजूनही निवडणुकीचे ‘एक्झीक्ट पोल’ काढण्यास असमर्थ ठरले आहे़ वणी विधानसभेसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व मनसे या पक्षांच्या पाच उमेदवारांमध्येच खरी लढत आहे़वणी विधानसभेमध्ये एकास एक लढतीत काँग्रेसविरोधी उमेदवारालाच नेहमी फायदा झाला व तिरंगी लढतीत नेहमी काँग्रेसलाच फायदा झाला़ हा मतदार संघ कुणबीबहुल असला तरी या समाजाने अजून तरी समाजाच्या उमेदवारासाठी एकसंघता दाखविल्याचे कोणत्याच सर्वात्रिक निवडणुकीत दिसले नाही़ आता मतदार व कार्यकर्ते चर्चा करताना या निवडणुकीची तुलना यापूर्वीच्या २००४, २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल व नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाशी लावून तर्कवितर्क काढले जात आहे़वणी विधानसभा मतदार संघात २ लाख ५७ हलार ३४६ मतदार आहेत़ त्यापैकी किमान ६५ ते ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास १ लाख ७७ हजार मतदान होण्याची शक्यता आहे. त्यात पाच उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित आठ उमेदवार १५ हजार मतांचे वाटेकरी आहेत़ उर्वरित १ लाख ६२ हजार मतांमध्ये पाच जणांची विभागणी कशी होते, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे़ सन २००४ च्या निवडणुकीत एकास एक लढत झाल्याने काँग्रेस विरोधी मतदार एकवटले होते़ त्यामुळे नांदेकरांनी कासावारांना तब्बल १४ हजार मतांनी मागे टाकले होते़ सन २००९ च्या निवडणुकीत लढत चौरंगी झाली़ त्यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांनी पहिल्यांदाच निवडणुकीत उडी घेऊन विरोधी मतांमध्ये वाटेकरी बनून ११ हजार मते आपल्याकडे खेचली़ देरकर यांनीही ४१ हजार मते घेतली होती. त्यामुळे नांदेकरांना ४५ हजारांवर आणण्यात या दोन उमेदवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परिणामी कासावार हे ५५ हजार ६६६ मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी देरकर रिंगणात नसते, तर कासावारांचा पराभव निश्चित होता़ आता नुकतीच एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली़ या निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाट होती़ तरीही काँग्रसचे संजय देवतळे यांनी वणी विधानसभा मतदार संघातून ३८ हजार २०७ मते घेतली़ याचा अर्थ वणी विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाची एवढी मते पक्की आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. आपचे उमेदवार चटप यांना २८ हजार मते मिळाली़ त्यावेळी देरकर चटप यांचेसोबत होते़ म्हणजेच देरकरांचीही तेवढी मते पक्की मानली जात आहे. त्यावेळी हंसराज अहीर यांना वणी विधानसभेत विक्रमी ९२ हजार मते मिळाली होती़ आता यापैकी किती मते भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी आपल्या झोळीत ओढू शकतात, त्यावर नांदेकरांचे भवितव्य अवलंबून आहे.अहीर यांच्या ९२ हजार मतांपैकी ५० हजार मते ज्यांच्या झोळीत पडतील, त्या उमेदवाराचे भवितव्य उज्वल समजले जात आहे. मात्र ९२ हजार मतांची विभागणी समसमान नांदेकर, बोदकुरवार यांच्यामध्ये झाल्यास दोघांचेही देऊळ पाण्यात आले़ त्यातच या चारही उमेदवारांसमोर उंबरकरांनीही कडवे आव्हान उभे केले आहे़नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे त्यांच्या मतांमध्ये मागील वेळेपेक्षा भरीव वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे यावेळी २००४, २००९ व लोकसभा निवडणुकीवरून अंदाज काढल्यास ते निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. या मतदार संघाची वास्तव स्थिती मशीनची दारे उघडल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे़