शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पंचरंगी लढतीने लागणार सर्वांचा कस

By admin | Updated: October 4, 2014 23:34 IST

वणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या

विनोद ताजने - वणीवणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे गणित मतदारांपुढे मांडत आहे़ निवडणूक जाणकार मात्र अजूनही निवडणुकीचे ‘एक्झीक्ट पोल’ काढण्यास असमर्थ ठरले आहे़ वणी विधानसभेसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व मनसे या पक्षांच्या पाच उमेदवारांमध्येच खरी लढत आहे़वणी विधानसभेमध्ये एकास एक लढतीत काँग्रेसविरोधी उमेदवारालाच नेहमी फायदा झाला व तिरंगी लढतीत नेहमी काँग्रेसलाच फायदा झाला़ हा मतदार संघ कुणबीबहुल असला तरी या समाजाने अजून तरी समाजाच्या उमेदवारासाठी एकसंघता दाखविल्याचे कोणत्याच सर्वात्रिक निवडणुकीत दिसले नाही़ आता मतदार व कार्यकर्ते चर्चा करताना या निवडणुकीची तुलना यापूर्वीच्या २००४, २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल व नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाशी लावून तर्कवितर्क काढले जात आहे़वणी विधानसभा मतदार संघात २ लाख ५७ हलार ३४६ मतदार आहेत़ त्यापैकी किमान ६५ ते ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास १ लाख ७७ हजार मतदान होण्याची शक्यता आहे. त्यात पाच उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित आठ उमेदवार १५ हजार मतांचे वाटेकरी आहेत़ उर्वरित १ लाख ६२ हजार मतांमध्ये पाच जणांची विभागणी कशी होते, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे़ सन २००४ च्या निवडणुकीत एकास एक लढत झाल्याने काँग्रेस विरोधी मतदार एकवटले होते़ त्यामुळे नांदेकरांनी कासावारांना तब्बल १४ हजार मतांनी मागे टाकले होते़ सन २००९ च्या निवडणुकीत लढत चौरंगी झाली़ त्यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांनी पहिल्यांदाच निवडणुकीत उडी घेऊन विरोधी मतांमध्ये वाटेकरी बनून ११ हजार मते आपल्याकडे खेचली़ देरकर यांनीही ४१ हजार मते घेतली होती. त्यामुळे नांदेकरांना ४५ हजारांवर आणण्यात या दोन उमेदवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परिणामी कासावार हे ५५ हजार ६६६ मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी देरकर रिंगणात नसते, तर कासावारांचा पराभव निश्चित होता़ आता नुकतीच एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली़ या निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाट होती़ तरीही काँग्रसचे संजय देवतळे यांनी वणी विधानसभा मतदार संघातून ३८ हजार २०७ मते घेतली़ याचा अर्थ वणी विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाची एवढी मते पक्की आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. आपचे उमेदवार चटप यांना २८ हजार मते मिळाली़ त्यावेळी देरकर चटप यांचेसोबत होते़ म्हणजेच देरकरांचीही तेवढी मते पक्की मानली जात आहे. त्यावेळी हंसराज अहीर यांना वणी विधानसभेत विक्रमी ९२ हजार मते मिळाली होती़ आता यापैकी किती मते भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी आपल्या झोळीत ओढू शकतात, त्यावर नांदेकरांचे भवितव्य अवलंबून आहे.अहीर यांच्या ९२ हजार मतांपैकी ५० हजार मते ज्यांच्या झोळीत पडतील, त्या उमेदवाराचे भवितव्य उज्वल समजले जात आहे. मात्र ९२ हजार मतांची विभागणी समसमान नांदेकर, बोदकुरवार यांच्यामध्ये झाल्यास दोघांचेही देऊळ पाण्यात आले़ त्यातच या चारही उमेदवारांसमोर उंबरकरांनीही कडवे आव्हान उभे केले आहे़नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे त्यांच्या मतांमध्ये मागील वेळेपेक्षा भरीव वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे यावेळी २००४, २००९ व लोकसभा निवडणुकीवरून अंदाज काढल्यास ते निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. या मतदार संघाची वास्तव स्थिती मशीनची दारे उघडल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे़