शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पंचरंगी लढतीने लागणार सर्वांचा कस

By admin | Updated: October 4, 2014 23:34 IST

वणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या

विनोद ताजने - वणीवणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे गणित मतदारांपुढे मांडत आहे़ निवडणूक जाणकार मात्र अजूनही निवडणुकीचे ‘एक्झीक्ट पोल’ काढण्यास असमर्थ ठरले आहे़ वणी विधानसभेसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व मनसे या पक्षांच्या पाच उमेदवारांमध्येच खरी लढत आहे़वणी विधानसभेमध्ये एकास एक लढतीत काँग्रेसविरोधी उमेदवारालाच नेहमी फायदा झाला व तिरंगी लढतीत नेहमी काँग्रेसलाच फायदा झाला़ हा मतदार संघ कुणबीबहुल असला तरी या समाजाने अजून तरी समाजाच्या उमेदवारासाठी एकसंघता दाखविल्याचे कोणत्याच सर्वात्रिक निवडणुकीत दिसले नाही़ आता मतदार व कार्यकर्ते चर्चा करताना या निवडणुकीची तुलना यापूर्वीच्या २००४, २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल व नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाशी लावून तर्कवितर्क काढले जात आहे़वणी विधानसभा मतदार संघात २ लाख ५७ हलार ३४६ मतदार आहेत़ त्यापैकी किमान ६५ ते ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास १ लाख ७७ हजार मतदान होण्याची शक्यता आहे. त्यात पाच उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित आठ उमेदवार १५ हजार मतांचे वाटेकरी आहेत़ उर्वरित १ लाख ६२ हजार मतांमध्ये पाच जणांची विभागणी कशी होते, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे़ सन २००४ च्या निवडणुकीत एकास एक लढत झाल्याने काँग्रेस विरोधी मतदार एकवटले होते़ त्यामुळे नांदेकरांनी कासावारांना तब्बल १४ हजार मतांनी मागे टाकले होते़ सन २००९ च्या निवडणुकीत लढत चौरंगी झाली़ त्यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांनी पहिल्यांदाच निवडणुकीत उडी घेऊन विरोधी मतांमध्ये वाटेकरी बनून ११ हजार मते आपल्याकडे खेचली़ देरकर यांनीही ४१ हजार मते घेतली होती. त्यामुळे नांदेकरांना ४५ हजारांवर आणण्यात या दोन उमेदवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परिणामी कासावार हे ५५ हजार ६६६ मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी देरकर रिंगणात नसते, तर कासावारांचा पराभव निश्चित होता़ आता नुकतीच एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली़ या निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाट होती़ तरीही काँग्रसचे संजय देवतळे यांनी वणी विधानसभा मतदार संघातून ३८ हजार २०७ मते घेतली़ याचा अर्थ वणी विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाची एवढी मते पक्की आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. आपचे उमेदवार चटप यांना २८ हजार मते मिळाली़ त्यावेळी देरकर चटप यांचेसोबत होते़ म्हणजेच देरकरांचीही तेवढी मते पक्की मानली जात आहे. त्यावेळी हंसराज अहीर यांना वणी विधानसभेत विक्रमी ९२ हजार मते मिळाली होती़ आता यापैकी किती मते भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी आपल्या झोळीत ओढू शकतात, त्यावर नांदेकरांचे भवितव्य अवलंबून आहे.अहीर यांच्या ९२ हजार मतांपैकी ५० हजार मते ज्यांच्या झोळीत पडतील, त्या उमेदवाराचे भवितव्य उज्वल समजले जात आहे. मात्र ९२ हजार मतांची विभागणी समसमान नांदेकर, बोदकुरवार यांच्यामध्ये झाल्यास दोघांचेही देऊळ पाण्यात आले़ त्यातच या चारही उमेदवारांसमोर उंबरकरांनीही कडवे आव्हान उभे केले आहे़नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे त्यांच्या मतांमध्ये मागील वेळेपेक्षा भरीव वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे यावेळी २००४, २००९ व लोकसभा निवडणुकीवरून अंदाज काढल्यास ते निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. या मतदार संघाची वास्तव स्थिती मशीनची दारे उघडल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे़