शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

सर्व ठाणे होणार आॅनलाईन पालकमंत्री : लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

By admin | Updated: October 4, 2015 00:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा ...

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा लागू करून ४६ सेवा आॅनलाईन केल्या आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे टप्प्या-टप्प्याने आॅनलाईन करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरला एमआयडीसी परिसरात लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, लोहाराचे सरपंच बबलू देशमुख, वाघापूरचे सरपंच विक्की राऊत, नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य सुमित बाजोरिया, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष सुराणा, माजी अपर पोलीस अधीक्षक सोने, एमआयडीसीचे सह-कार्यकारी अधिकारी रावते आदी उपस्थित होते.पालकमंत्री राठोड म्हणाले की, आजही महाराष्ट्र पोलीसांची गणना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांसोबत होते. मात्र अपुरे मनुष्यबळ, सततच्या ड्यूटी, वसाहतीचा प्रश्न यामुळे पोलीस बांधव तणावात राहतात. शासनाने पोलिसांवरील तणाव कमी करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन कामाच्या पद्धतीत बरेच बदल केले आहे. पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आग्रही असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी खासदार भावना गवळी यांनी पोलिसांकडून कधी प्रेमाने तर कधी पोलिसी खाक्याने कामाची अपेक्षा असल्याचे सांगितले. कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नेहमीच तत्पर असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पोलिसांनी गुन्हेगारांवर नेहमी जरब निर्माण करावी. सामान्य जनतेसाठी मात्र त्यांनी आईच्या भूमिकेत असले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. आभार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी मानले. तर सूत्रसंचालन अजित डेहणकर यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजकांसह, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)