शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

विषबाधेला कृषी, महसूल, आरोग्य, पोलिसांसह सर्वच विभाग जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:17 IST

फवारणीमुळे विषबाधा प्रकरणात कृषी, आरोग्य, महसूल आणि पोलीस हे सर्वच विभाग जबाबदार आहे. चौकशीअंती यात दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, .....

ठळक मुद्देकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर : दोषींची गय नाही, चौकशी अहवालानंतर कठोर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फवारणीमुळे विषबाधा प्रकरणात कृषी, आरोग्य, महसूल आणि पोलीस हे सर्वच विभाग जबाबदार आहे. चौकशीअंती यात दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, असा इशारा कृषीमंत्री पांडुरंग फुडकर यांनी दिला.पिकांवरील फवारणीमुळे विषबाधा होऊन १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी कृषीमंत्री फुंडकर परिस्थितीची पाहणी आणि मृत शेतकºयांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाले. घाटंजी तालुक्यातील मानोली येथील बंडू चंद्रभान सोनुले यांच्या परिववारची त्यांनी भेट घेतली. नंतर यवतमाळात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, २८ सप्टेंबरला सर्वप्रथम या प्रकरणाची माहिती मिळाली. नंतर लगेच यंत्रणा सक्रिय केली. मात्र तोपर्यंत कोणत्याच विभागाकडून याची माहिती जिल्हाधिकारी अथवा सरकारपर्यंत पोहोचली नव्हती. विषबाधेमुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील १० शेतकरी आणि ९ शेतमजुरांचा बळी गेला. फवारणीसाठी परवाना नसलेला चिनी बनावटीचा पंप वापरण्यात आला. याला जबाबदार असणाºयांवर कारवाई करू, अशी ग्वाही फुंडकर यांनी दिली.परवानगी नसलेले टॉनिक दिल्यामुळे यावर्षी झाडांची उंची वाढली. त्यामुळे फवारणी अंगावर उलटली. तथापि यावर तत्काळ प्रतिबंधक कारवाई झाली नाही. मात्र आता चौकशी समिती नेमली असून या सर्व प्रकरणात दोषी आढळणाºयांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पालकमंत्री मदन येरावार, शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आरोग्य सभापती नंदिनी दरणे, राजू डांगे उपस्थित होते.मोन्सॅन्टो कंपनी हद्दपार व्हावीबीजी-३ बियाणे वापरल्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागली. याला बियाणे जबाबदार आहे. हे बियाणे उत्पादन करणाºया मोन्सॅन्टो कंपनीला आपला विरोध आहे. ही कंपनी देशातून हद्दपार व्हावी, अशी आपली भूमिका असल्याचे कृषीमंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले. तसेच बीजी बियाण्यांना पर्यायी बियाणे तयार करण्याची आदेश दिल्याचे सांगितले. येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय समितीचा अहवाल अपेक्षित असून त्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करू. अनधिकृत कीटकनाशक आणि बियाणे कंपन्यांविरूद्धही त्वरित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.