शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

२५ मिनिटांत जिंकली सर्वांची मने

By admin | Updated: October 1, 2014 23:31 IST

‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’, अशी मराठीत एक एक म्हण आहे. त्याची प्रचिती बुधवारी वणीत आली. निमित्त होते, राज ठाकरे यांच्या सभेचे. अवघ्या २५ मिनिटांत त्यांनी या मतदार

राज ठाकरे यांची जादू : वणी परिसरातील समस्यांची जाण, कोळसा खाणींच्या समस्याही अवगतवणी : ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’, अशी मराठीत एक एक म्हण आहे. त्याची प्रचिती बुधवारी वणीत आली. निमित्त होते, राज ठाकरे यांच्या सभेचे. अवघ्या २५ मिनिटांत त्यांनी या मतदार संघातील समस्यांची जंत्री सादर करून त्यांना या मतदार संघाची किती माहिती आहे, याचे प्रत्यंतर आणून दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्रात फर्डे वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी नेहमीच गर्दीही होते. मागीलवेळी ते वणीत आले होते. मात्र त्यांनी केवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. थेट जनतेशी त्यांनी त्यावेळी संवाद साधला नव्हता. त्यामुळे वणीकरांच्या मनात हूरहूर होती. त्यांचे भाषण ऐकण्यास न मिळाल्याने त्यावेळी जनता हिरमुसली होती. ती हूरहूर आणि हिरमुसलेली जनता आज त्यांच्या २५ मिनीटांच्या भाषणाने हुरळून गेली. अवघ्या २५ मिनीटांत त्यांनी येथील जनतेची मने जिंकली. १२ वाजून ४ मिनीटांनी त्यांचे आगमन झाले अन् १२ वाजून ७ मिनीटांनी त्यांचे भाषण सुरू झाले. अवघे २५ मिनीट म्हणजे १२ वाजून ३२ मिनीटांपर्यंत ते बोलत होते अन् उपस्थित जनता टक लावून केवळ ऐकत होती.येथील शासकीय मैदानावर आयोजित सभेत बोलताना त्यांनी या परिसरातील प्रदूषण, आरोग्य, रस्ते, वीज आदी समस्यांचा खरपूस समाचार घेतला. गेल्या ६0 वर्षांत जनतेला या सुविधा देऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेतले. वणीचा ‘ब्लॅक डायमंड सिटी’, असा होत असलेला उल्लेख करून त्यांनी यवतमाळपासून ते वणीपर्यंतचा रस्ता कसा खाचखळग्यांनीच भरला होता, हे कथन केले. या रस्त्यामुळेच आपल्या शरीरात किती हाडे आहेत, याची जाणीव झाल्याचेही त्यांनी त्यांनी सांगून टाकले. कोळसा खाणींमुळे या परिसरातील जनतेला आजारांची कशी देणगी मिळाली, हे सांगून त्यांनी या परिसरातील समस्यांची आपल्याला जाण असल्याचे अधोरेखित केले. प्रदूषणामुळे आरोग्यावरील खर्च वाढल्याने जनता कर्जबाजारी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या सुरू असलेल्या युती आणि आघाडी तुटण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी भाष्य केले. कोण कोणत्या पक्षात आहे, हेच कळेनासे झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व चित्र बदलण्यासाठीच आता मनसेने कंबर कसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी उपस्थितांनीही प्रचंड टाळ्या वाजवून त्यांच्या बोलण्याला एकप्रकारे सहमती दर्शविली. अवघ्या २५ मिनीटांत त्यांनी विविध मुद्दे, देश व राज्य पातळीवरील तसेच मतदार संघातील समस्यांचा उहापोह केला. यावरून त्यांना समस्यांची जाण असल्याचेही दिसून आले. वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील ग्रामस्थाही त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळी विविध वाहनांनी वणीत आले होते. मात्र सभास्थळी कुठेही गडबड झाली नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (कार्यालय प्रतिनिधी)