शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुजोरीपुढे सर्वच हतबल

By admin | Updated: July 15, 2016 02:34 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे.

पीककर्ज वाटप : शेतकरी मिशन देणार दिल्लीत धडक यवतमाळ : राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने बँकांच्या या भूमिकेबाबत पुढील आठवड्यात थेट दिल्लीत धडक देण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा प्रशासनाने सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. सहकारी बँकांनी हे उद्दिष्ट जवळपास गाठले असले तरी राष्ट्रीयकृत बँका अद्याप अर्ध्यावरही पोहोचलेल्या नाही. या बँकांचे कर्ज वाटप अवघे ४० टक्क्यांवर आहे. त्यातही सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वात मागे असल्याचे सांगितले जाते. एसबीआयला ४७० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. परंतु या बँकेने केवळ १७० कोटी रुपयांचे वाटप केले. खरीप हंगामाची पेरणी आटोपली असताना ही बँक उर्वरित २०० कोटींचे कर्ज केव्हा वितरीत करणार, असा सवाल आहे. युनियन बँकेबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहे. या बँकेत शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. पीककर्ज वाटपासाठी ३१ मे ही अंतिम तारीख होती. त्यानंतर ३१ जून व आता ३१ जुलै उजाडतेय, तरीही बँका पेरणीसाठी पैसे देत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून प्रत्येकवेळी रिझर्व्ह बँकेची नियमावली पुढे केली जात आहे. एक कोटींच्या शेताचा मालक असलेल्या शेतकऱ्याला एक लाखाचे कर्ज देण्यासाठी ऐवढे हेलपाटे का, असा सवाल विचारला जात आहे. पीककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँकांच्या कठोर व मुजोर धोरणापुढे मंत्री, आमदार, प्रशासन असे सर्वच घटक हतबल झाले आहे. खास शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही बँकांच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढावे, नव्या शेतकऱ्यांना कर्ज देता यावे, यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्याऐवजी शेतकऱ्यांवर हात उगारत आहेत. बँकांमुळेच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे तिवारी म्हणाले. ३१ मे ही कर्ज वाटपाची शेवटची तारीख असताना या तारखेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाचे वाटपच सुरू केले नव्हते, अशी माहितीही तिवारी यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)