शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुजोरीपुढे सर्वच हतबल

By admin | Updated: July 15, 2016 02:34 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे.

पीककर्ज वाटप : शेतकरी मिशन देणार दिल्लीत धडक यवतमाळ : राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने बँकांच्या या भूमिकेबाबत पुढील आठवड्यात थेट दिल्लीत धडक देण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा प्रशासनाने सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. सहकारी बँकांनी हे उद्दिष्ट जवळपास गाठले असले तरी राष्ट्रीयकृत बँका अद्याप अर्ध्यावरही पोहोचलेल्या नाही. या बँकांचे कर्ज वाटप अवघे ४० टक्क्यांवर आहे. त्यातही सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वात मागे असल्याचे सांगितले जाते. एसबीआयला ४७० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. परंतु या बँकेने केवळ १७० कोटी रुपयांचे वाटप केले. खरीप हंगामाची पेरणी आटोपली असताना ही बँक उर्वरित २०० कोटींचे कर्ज केव्हा वितरीत करणार, असा सवाल आहे. युनियन बँकेबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहे. या बँकेत शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. पीककर्ज वाटपासाठी ३१ मे ही अंतिम तारीख होती. त्यानंतर ३१ जून व आता ३१ जुलै उजाडतेय, तरीही बँका पेरणीसाठी पैसे देत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून प्रत्येकवेळी रिझर्व्ह बँकेची नियमावली पुढे केली जात आहे. एक कोटींच्या शेताचा मालक असलेल्या शेतकऱ्याला एक लाखाचे कर्ज देण्यासाठी ऐवढे हेलपाटे का, असा सवाल विचारला जात आहे. पीककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँकांच्या कठोर व मुजोर धोरणापुढे मंत्री, आमदार, प्रशासन असे सर्वच घटक हतबल झाले आहे. खास शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही बँकांच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढावे, नव्या शेतकऱ्यांना कर्ज देता यावे, यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्याऐवजी शेतकऱ्यांवर हात उगारत आहेत. बँकांमुळेच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे तिवारी म्हणाले. ३१ मे ही कर्ज वाटपाची शेवटची तारीख असताना या तारखेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाचे वाटपच सुरू केले नव्हते, अशी माहितीही तिवारी यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)