शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आदर्श ग्रामसाठी सर्व विभागांचे योगदान

By admin | Updated: August 17, 2016 01:17 IST

राज्यपाल, खासदार आणि आमदार आदर्शग्राम योजना ही अत्यंत चांगल्या हेतूने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राम योजना आढावा बैठक : गावांचा सर्वांगिण विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश यवतमाळ : राज्यपाल, खासदार आणि आमदार आदर्शग्राम योजना ही अत्यंत चांगल्या हेतूने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्व विभागांचे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी निवडलेली गावे सर्व सोयींनी युक्त करताना सर्व विभागांनी एकत्रितरित्या या गावांना प्राधान्यावर ठेऊन विकासात्मक कामे राबवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. ते आदर्श ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आदर्शग्रामसाठी बारा गावे लोकप्रतिनिधींनी निवडली आहे. या गावांत शासनाच्या योजना पोहोचविण्यासोबतच या गावातील नागरीकांचे राहणीमान, आचार विचारात बदल घडवून आणावयाचा आहे. प्रामुख्याने गावात आधार नोंदणी, मध्यान्ह भोजन, कुपोषित बालकांची श्रेणीवाढ, आरोग्याच्या सुविधा आदींसोबतच अंगणवाडी, वाचनालय, आरोग्य केंद्र या भौतिक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा लागणार आहे. या गावाच्या विकासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष अधिकाऱ्यांनी गावाचा एकत्रित आराखडा तयार करून तो लोकप्रतिनिधींच्या मान्यतेने नियोजन विभागाकडे सादर करावा. यातील ज्या सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणे शक्य असेल, त्याला नियोजन विभागाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा ह्या गावाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार नोंदणीसाठी पुढाकार घेऊन संपूर्ण नोंदणी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावात आरोग्य शिबिर आयोजित करून दुर्धर व असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्यांना उपचार देण्याची व्यवस्था करावी, जनधनअंतर्गत खाती उघडण्यासाठी प्रयत्न करावा, मातीचे नमूने तपासावेत, तसेच जिल्हा परिषदेने आपल्या प्रत्येक योजनेत या गावांना प्राधान्य क्रमाने घेऊन शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)