शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केरळातील ‘निपाह’ विषाणूवर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:21 IST

केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.निपाह विषाणूच्या उद्रेकामुळे केरळच्या केझीकोडे येथे नऊ जणांचा मृत्यू झाला. या विषाणूची सर्वत्र दहशत आहे. आरोग्य यंत्रणेने तातडीने खबरदारीची पावले उचलावी असा आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने काढला आहे. या विषाणूचा प्रसार फळांवर जगणाऱ्या वटवाघूळाकडून होतो. वटवाघुळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने या आजाराचा धोका आहे. डुक्कर व इतर पाळीव प्राण्यांपासून होण्याची शक्यता आहे. निपा या विषाणूच्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे आढळतात. लागण झालेल्या ७० टक्के रुग्णाचा मृत्यू अटळ आहे. या आजाराबाबत कुठलेही औषध उपलब्ध नाही. लक्षणावरूच उपचार केला जातो.आजाराचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा व नाकातील स्राव, मूत्र व रक्त नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्टÑीय विषाणू विज्ञान संस्थेत होते. या आजाराबाबत राज्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. वरील लक्षणे आढळलेल्या रुग्णांचे नमुने तातडीने पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे, अशा रुग्णाला उपचाराकरिता विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे, डॉक्टर व नर्सनी उपचार करताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाकडून महाराष्टÑाच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अहवाल मागविण्यात आला आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू