शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

केरळातील ‘निपाह’ विषाणूवर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:21 IST

केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.निपाह विषाणूच्या उद्रेकामुळे केरळच्या केझीकोडे येथे नऊ जणांचा मृत्यू झाला. या विषाणूची सर्वत्र दहशत आहे. आरोग्य यंत्रणेने तातडीने खबरदारीची पावले उचलावी असा आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने काढला आहे. या विषाणूचा प्रसार फळांवर जगणाऱ्या वटवाघूळाकडून होतो. वटवाघुळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने या आजाराचा धोका आहे. डुक्कर व इतर पाळीव प्राण्यांपासून होण्याची शक्यता आहे. निपा या विषाणूच्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे आढळतात. लागण झालेल्या ७० टक्के रुग्णाचा मृत्यू अटळ आहे. या आजाराबाबत कुठलेही औषध उपलब्ध नाही. लक्षणावरूच उपचार केला जातो.आजाराचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा व नाकातील स्राव, मूत्र व रक्त नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्टÑीय विषाणू विज्ञान संस्थेत होते. या आजाराबाबत राज्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. वरील लक्षणे आढळलेल्या रुग्णांचे नमुने तातडीने पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे, अशा रुग्णाला उपचाराकरिता विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे, डॉक्टर व नर्सनी उपचार करताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाकडून महाराष्टÑाच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अहवाल मागविण्यात आला आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू