शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

बँकांंना २१४२ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:58 IST

यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : कर्जवाटपाची सर्वाधिक जबाबदारी राष्ट्रीयीकृत बँकांवर

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे.कर्जमाफीच्या प्रक्रियेसोबतच आता कर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्हा बँकेने कर्ज वितरण सुरू केले आहे. आत्तापर्यंत जिल्हा बँकेने चार कोटींचे कर्जवाटपसुद्धा केले. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांची गती धीमी आहे. कर्ज वितरण प्रक्रियेत सर्व शेतकऱ्यांना सामावून घेण्याच्या सूचना आहेत. तसे पत्र अग्रणी बँकेने सर्व बँकांच्या शाखांना पाठविले आहे.गतवर्षी बँकांना एक हजार ८३६ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. यात यावर्षी २० टक्के वाढ करण्याचे निर्देश आहे. यात सर्वाधिक कर्जाचे वितरण राष्ट्रीयकृत बँका करणार आहे. या बँकांना एक हजार ४४० कोटींचे कर्ज वितरित करावे लागणार आहे. जिल्हा बँकेला ५३९ कोटींचे उद्दीष्ट असून विदर्भ कोकण बँकेला १६२ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले.खरीप हंगामात हळद पिकाला सर्वाधिक कर्ज देण्याचा निर्णय बँक स्तरावर घेण्यात आला. हळद पिकाला हेक्टरी ९० हजारांचे पीक कर्ज दिले जाणार आहे. कापसाला हेक्टरी ५२ हजार, तर कोरडवाहू कापसाला हेक्टरी ४२ हजारांचे कर्ज मिळणार आहे. सोयाबीनला २७ ते ३७ हजार ५०० रूपयांचे हेक्टरी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. तुरीसाठी हेक्टरी २६ ते ३५ हजार रूपयांचे कर्ज मंजूर केले जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्ज वाटपात वाढ करण्याचे निर्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि कर्जमाफी प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने ज्यांचे कर्ज माफ झाले नाही, त्या शेतकऱ्यांना चिंता आहे.नवीन सभासदांना कर्जाची अपेक्षादरवर्षी थकीत कर्जाचे प्रमाण जादा असल्याने नवीन सभासदांना कर्जच वितरित केले जात नाही. मात्र यावर्षी कर्जमाफीमुळे बँकांची थकबाकी वसूल होणार आहे. त्यामुळे नवीन सभासदांना कर्ज मिळण्याची अशा पल्लवीत झाली आहे. अशा अनेक नवीन सभासदांना त्यांच्या बँकेकडून खरिपासाठी पीक कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँक कर्ज वाटपास का-कू करतात, हे वास्तव आहे.ज्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली, अशा शेतकऱ्यांना मागणीनुसार नव्याने कर्ज दिले जाणार आहे.- अर्चना माळवेप्रभारी जिल्हा उपनिबंधकराष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना कर्ज वितरणाच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याचे पत्र त्यांना देण्यात आले.- कैलास कुमरेव्यवस्थापक, अग्रणी बँक

टॅग्स :bankबँक