शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

कृषिपंपांना सहा तास अखंड वीज

By admin | Updated: October 29, 2015 02:49 IST

सततच्या खंडित वीज पुरवठ्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले असून वीज वितरण कंपनीविरोधात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन रोष व्यक्त करीत आहे.

पालकमंत्र्यांची ग्वाही : मुंबईच्या अधिकाऱ्यांची यवतमाळात बैठकयवतमाळ : सततच्या खंडित वीज पुरवठ्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले असून वीज वितरण कंपनीविरोधात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन रोष व्यक्त करीत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी यवतमाळात मुंबईच्या अधिकाऱ्यांना बोलावून पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. यात कृषिपंपांना सहा तास अखंड वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, महावितरणचे मुंबई येथील कार्यकारी संचालक दिनेश साबू, महापारेषणचे संचालक (संचलन) एम्पाल, मुख्य अभियंता सुहास रंगारी, महापारेषणचे मुख्य अभियंता एस.जे. पाटील, अधीक्षक अभियंता विजय भटकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता बी.पी. अवघड उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने कृषिपंपांच्या वीज पुरवठ्यावर चर्चा करण्यात आली. वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी दोन दिवसात तीन बैठकीही घेण्यात आल्या. त्यानुसार आता कृषिपंपांना सहा तास अखंड वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी सुधारित ३ फेज उपलब्धता कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यानुसार ३७ कृषी वाहिन्यांची चार समान गटात विभागणी करून चक्राकार पद्धतीने सहा तास अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे २५ ते ३० मेगावॅटचा भार कमी होऊन आपदकालीन भारनियमन कमी होण्यास मदत होणार आहे. अतिउच्चदाब वाहिन्यांच्या विद्युत भाराचे विश्लेषण करून वर्धा-यवतमाळ-पुसद या २०० केव्ही लाईनचा विद्युत भार २५ ते ३० मेगावॅटने कमी करून उच्चदाब वाहिनीवर वळता केला आहे. या वाहिन्यांवरील विद्युत भार नियंत्रणात ठेऊन आपातकालीन भारनियमन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे या बैठकीत ठरले. या निर्णयाची बुधवारपासूनच अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच कृषी पंपाच्या वीज जोडण्या मार्ग अखेरपूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे. सौर कृषिपंपाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिकासाठी सौर पंप लावण्याची सूचना यावेळी देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)