शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शेती व्यवसायावर आली अवकळा

By admin | Updated: January 24, 2015 23:03 IST

शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़

घोन्सा : शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, असा समाजाचा दृष्टीकोन होता़ त्यावेळी शेती हा व्यवसाय प्रत्येकाला परवडण्यासारखा होता़ त्यावेळी कापसाचा भाव आणि सोन्याचा भाव जवळपास सारखाच असायचा़ त्यामुळे शेती व्यवसायाला उत्तम म्हणून संबोधले जात होते़ परंतु सध्या परिस्थिती फारच बदलली आहे़ त्यामुळे आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, अशी अवस्था झाली आहे़ वाढलेली महागाई आणि शेतीमालाला भेटणारा तोकडा भाव, यामुळे शेती व्यवसायावर अवकाळ पसरली आहे़गेल्या दोन वर्षांपासून शेती व्यवसाय अतिशय अडचणीत सापडला आहे़ मागीलवर्षी झालेला ओला दुष्काळ आणि त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान, यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला होता़ उत्पन्नामध्येही घट झाली होती़ त्यानंतर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी जोमाने तयारी केली. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली. यावर्षीसुध्दा पाऊस आणि कमी भावामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे़ शेतीला लावलेला खर्चही यावर्षी निघू शकला नाही़ परिणामी शेतकरी विवंचनेत सापडले आहे़ याच वर्षी शेतकरी वर्गाच्या विकासाच्या गोष्टी सांगून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नवीन सरकार स्थापन झाले़ परंतु या सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही़ शेती उत्पन्नाला योग्य तो भावसुध्दा मिळाला नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसायावर अवकळा पसरत असल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)