शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

कृषीच्या योजनांनी वाढविली डोकेदुखी

By admin | Updated: November 29, 2014 23:28 IST

शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी कृषी साहित्याचा अनुदानावर पुरवठा केला जातो. मात्र आता या पद्धतीत बदल केला असून थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जात आहे.

थेट अनुदान ठरते त्रासदायक : शेतकऱ्यांना मोजावी लागते पूर्ण रक्कमपुसद : शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी कृषी साहित्याचा अनुदानावर पुरवठा केला जातो. मात्र आता या पद्धतीत बदल केला असून थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी डोकेदुखी वाढली आहे. या वस्तू खरेदी करताना पूर्ण रक्कम मोजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेती तंत्रज्ञानातील बदलत्या पद्धतीमुळे दिवसेंदिवस आधुनिक यंत्रसामुग्री निघत आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी ठरत असली तरी त्यांच्या किमती न झेपवणाऱ्या आहेत. त्यामुळेच शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनुदानावर कृषी साहित्य पुरवठा करण्याच्या डझनावर योजना राबविल्या जातात. पूर्वी साहित्यावर दिले जाणारे अनुदान हे थेट पुरवठादार कंपनीलाच मिळत होते. त्यामुळे अनुदान वगळता मूळ किमतीपेक्षाही कमी किमतीत शेतकऱ्यांना हे साहित्य खरेदी करता येत होते. या प्रक्रियेत वेळही लागत नव्हता. आता मात्र शासनाने थेट अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता कृषी साहित्य खरेदी करताना त्याची पूर्ण रक्कम शेतकऱ्याला मोजावी लागते. त्यानंतर शासनाकडून ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी साहित्य खरेदी करताना एक रक्कम देवू शकत नाही. शिवाय शासनाकडून मिळणारे अनुदानही कधीच वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात नाही. त्यात दहा ते बारा महिन्यांचा कालावधी लागतो. अनेकदा तर साहित्य खरेदी करण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून त्याची रक्कम भरून घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या साहित्य खरेदीत नव्या योजनेमुळे प्रचंड त्रास होत आहे. थेट अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी उलट डोकेदुखी वाढली आहे. बहुतांश योजनांची शेतकऱ्यांना माहिती नाही. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. (तालुका प्रतिनिधी)