शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रात्रीच्या काळोखात कृषी सिंचन, शेतकऱ्यांच्या सिंचनाचे अजब वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 12:00 IST

Yawatmal News agriculture यावर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र सिंचन करण्यासाठी लागणारी वीज रात्रीला दिली जाते. या अवस्थेतही शेतकरी रब्बीचे सिंचन करीत आहे.

ठळक मुद्देपिकांना पाणी देण्यासाठी जागुन काढावी लागते रात्रशॉक लागुन मृत्यू, अन वन्यप्राण्याचा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : यावर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र सिंचन करण्यासाठी लागणारी वीज रात्रीला दिली जाते. या अवस्थेतही शेतकरी रब्बीचे सिंचन करीत आहे. त्यातही कमी दाब, लाईन ट्रीप होने अशे अणेक प्रकार घडतात. वीजेचा शॉक लागुन काहींचा मृत्यू झाला. तर काहींना सर्पदंश आणि जंगली जनावरांच्या हल्यास समोर जावे लागले. यानंतरही शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या संवेदना जाणुन घेण्यासाठी तयार नाही.

वीजेचे वीतरण करतांना पहीले प्राधान्य उद्योगाला, नंतर घरगुती ग्राहक आणि सरते शेवटी शेतीला वीजेचा पुरवठा होतो. यातही तीन दिवस दिवसा, आणि तीन दिवस रात्रीला वीजेचा पुरवठा होतो. एक दिवस सुटी राहते. रात्रीला होणारा वीजेचा पुरवठा मध्यरात्रीस सुरू होतो. कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना सिंचन करावे लागते. यासाठी शेतकरी रात्र जागुन काढतात. त्यानंतरही त्यांचे ओलीत होत नाही. हा गंभीर प्रकार शेतीच्या अर्थव्यवस्थेला खिळ घालणार आहे. यानंतरही शेतकरी संकटांचा सामना करीत सिंचनाचा प्रयत्न करीत आहेत.

कृषी फिडरवर १६ तासाचे भारनियमन

कृषी फिडर आणि गावठान असा वीेजेचा पुरवठा विभागण्यात आला आहे. गावठान म्हणजे गावाला मिळणारी वीज आणि शेतीला मिळणारी वीज अशी विभागनी आहे. यात कृषी फिडरवर १६ तासाचे भारनियमन आकरले आहे. रात्री ११ चा वीज पुरवठा करण्यात येतो. अशा काळोखात शेतकऱ्यांना सिंचन करायचे असते. यात शेतकऱ्यांना स्वताचा जीवही गमवावा लागतो. हा कृर प्रकार थांबण्याचे नावच घेत नाही. लोकप्रतिनीधीचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे.

शेतकऱ्यांची कुनालाच काळजी नाही. प्रत्येकजन बेफाम वागत आहे. रात्रीच्या वीज पुरवठ्यात अनेकवेळा कमी दाबाचा पुरवठा होतो. त्यात मोटरपंप जळतात. रानडूक्कर, साप इतर प्राण्याचा हल्ला झाला तर कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळालीच पाहीजे.

शरद पाटील,

वनवारला, पुसद

वीज पुरठा सूरळीत असतो. दर महिन्याला वीजेच्या वेळापत्रकात विभागा नुसार बदल केला जातो. यात काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्रीला वीज पुरवठा केला जातो. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार हा वीज पुरवठा होतो.

संजय आडे

उप विभागिय अधिकारी वीज वितरण कंपनी, पुसद विभाग

जमेच्या बाजू

१ . जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला. यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत. विहीरी तुडूंब भरल्या आहेत. यामुळे मोठया प्रमाणात सिंचन शक्य आहे.

२. सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्रही सिंचनाखाली येण्याची संख्या वाढत आहे. शिवाय अनुदानावर बियाणे मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत सिंचनाखाली क्षेत्र आणता येणार आहे.

टॅग्स :agricultureशेती