शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनासाठी कृषी विकास योजना

By admin | Updated: March 14, 2016 02:46 IST

शेतकऱ्यांसाठी परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) नव्याने सुरू करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा,

विषमुक्त अन्नासाठी प्रयत्न : केंद्रातर्फे ६० तर राज्य सरकारतर्फे ४० टक्के निधीयवतमाळ : शेतकऱ्यांसाठी परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) नव्याने सुरू करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.केंद्र शासनाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेतीसाठी परंपरागत कृषी विकास योजना या वर्षात राबविण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी केंद्र ६० आणि राज्य ४० टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेत निवडलेल्या गावात किंवा गाव समूहात ५० शेतकऱ्यांचा ५० एकराचा गट तयार करून या क्षेत्रावर तीन वर्षामध्ये योजनेतील विविध घटक राबवून गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते किंवा किटकनाशके वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. सेंद्रीय शेती कार्यक्रमात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच यात महिला गटास प्राधान्य देण्यात येईल. गटात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान दोन पशूधन असणे आवश्यक आहे.या योजनेंतर्गत प्रति गटावर पहिल्या वर्षी सहा लाख ५६ हजार ७४०, दुसऱ्या वर्षी पाच लाख २३ हजार ६७० आणि तिसऱ्या वर्षी तीन लाख १४ हजार ५९० असे तीन वर्षात १४ लाख ९५ हजार रूपयांचे अनुदान खर्च करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी ३८ गटामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गट तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा यांच्याशी संपर्क साधून योजनेची माहिती घेऊन ५० शेतकऱ्यांचा ५० एकराचा गट तयार करून आपला प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. शेतीमध्ये रासायनिक खते, किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा वापर वाढत असून यामधून उत्पादित शेतमालामध्ये या रसायनांचे अंश शिल्लक राहतात, असे रसायन किंवा विषयुक्त अन्न खाल्याने मानवी आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. यावर मात करून विषमुक्त अन्नधान्य पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. सेंद्रीय शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतमाल उत्पादकाला प्रोत्साहन मिळू शकेल.