शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने कागदोपत्री काढला बंंधाऱ्यातील गाळ

By admin | Updated: March 2, 2015 02:12 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून विदर्भ सिंचन कार्यक्रम राबविला जात आहे.

महागाव : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून विदर्भ सिंचन कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र महागाव येथील तालुका कृषी विभागाने या कार्याला नख लावले. १४ लाख रुपयांचा गाळ कागदोपत्री काढल्याचे दाखविले. एवढेच नाही तर पंचायत समिती उपसभापतीच्या नावे धनादेशही काढण्यात आला. महागाव तालुक्यातील उटी ते हिंगणी या पाच किलोमीटर अंतरात असलेल्या नाल्यावर २००८ साली सिमेंटचे चार बांध घालण्यात आले. या बांधातील साचलेला गाळ काढण्याची ही उठाठेव करण्यात आली. आपल्या अधिनस्त मंडळ अधिकाऱ्यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांनी बिले सादर करण्यास सांगितले. दरम्यान रणवीर आजारी रजेवर गेले. त्यामुळे काम रखडले. रणवीर यांचा पदभार मंडळ अधिकारी बी.एच. राठोड यांच्याकडे देण्यात आला. राठोड यांनी बनावट बिले काढणार नाही म्हणून सर्वांना दम भरला. नव्हे तसे पत्रच तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी पुसद यांना २० फेब्रुवारी रोजी दिले. रणवीर यांनी कामावर रुजू होताच १४ लाख रुपये काढण्यासाठी कोषटवार या मंडळ अधिकाऱ्यांना बदलून मर्जीतील उल्हास राठोड यांची नेमणूक केली. १४ लाखांचे बिल आणि बनावट मोजमाप पुस्तक तयार केल्याचा आरोप आहे. यावरही बी.एच. राठोड यांनी लेखी आक्षेप घेतला. तसे पत्र २० फेब्रुवारी रोजी दिले आहे. असे असताना १८ फेब्रुवारी रोजी १४ लाख चार हजार २३५ रुपयांचा धनादेश श्रीनिवास देशमुख यांच्या नावे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अदा केला. या संदर्भात तालुका कृषी विभागाचे सहायक अभियंता मुकुंद कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी धनादेश दिल्याचे सांगितले. कागदोपत्री झालेल्या या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी ते विदर्भ सिंचन कामाचा आढावा घेणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. ( शहर प्रतिनिधी)