शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कृषी विभागाने कागदोपत्री काढला बंंधाऱ्यातील गाळ

By admin | Updated: March 2, 2015 02:12 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून विदर्भ सिंचन कार्यक्रम राबविला जात आहे.

महागाव : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून विदर्भ सिंचन कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र महागाव येथील तालुका कृषी विभागाने या कार्याला नख लावले. १४ लाख रुपयांचा गाळ कागदोपत्री काढल्याचे दाखविले. एवढेच नाही तर पंचायत समिती उपसभापतीच्या नावे धनादेशही काढण्यात आला. महागाव तालुक्यातील उटी ते हिंगणी या पाच किलोमीटर अंतरात असलेल्या नाल्यावर २००८ साली सिमेंटचे चार बांध घालण्यात आले. या बांधातील साचलेला गाळ काढण्याची ही उठाठेव करण्यात आली. आपल्या अधिनस्त मंडळ अधिकाऱ्यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांनी बिले सादर करण्यास सांगितले. दरम्यान रणवीर आजारी रजेवर गेले. त्यामुळे काम रखडले. रणवीर यांचा पदभार मंडळ अधिकारी बी.एच. राठोड यांच्याकडे देण्यात आला. राठोड यांनी बनावट बिले काढणार नाही म्हणून सर्वांना दम भरला. नव्हे तसे पत्रच तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी पुसद यांना २० फेब्रुवारी रोजी दिले. रणवीर यांनी कामावर रुजू होताच १४ लाख रुपये काढण्यासाठी कोषटवार या मंडळ अधिकाऱ्यांना बदलून मर्जीतील उल्हास राठोड यांची नेमणूक केली. १४ लाखांचे बिल आणि बनावट मोजमाप पुस्तक तयार केल्याचा आरोप आहे. यावरही बी.एच. राठोड यांनी लेखी आक्षेप घेतला. तसे पत्र २० फेब्रुवारी रोजी दिले आहे. असे असताना १८ फेब्रुवारी रोजी १४ लाख चार हजार २३५ रुपयांचा धनादेश श्रीनिवास देशमुख यांच्या नावे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अदा केला. या संदर्भात तालुका कृषी विभागाचे सहायक अभियंता मुकुंद कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी धनादेश दिल्याचे सांगितले. कागदोपत्री झालेल्या या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी ते विदर्भ सिंचन कामाचा आढावा घेणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. ( शहर प्रतिनिधी)