शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

शेतकी कंपन्या शेतकऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:48 IST

राळेगाव : तालुक्यात मागील काही महिन्यांत मोठ्या संख्येने शेतकी कंपन्या स्थापन झाल्या असून, त्या कार्यप्रवण करण्याच्या दृष्टीने ...

राळेगाव : तालुक्यात मागील काही महिन्यांत मोठ्या संख्येने शेतकी कंपन्या स्थापन झाल्या असून, त्या कार्यप्रवण करण्याच्या दृष्टीने शेतकरी भागधारक मिळविण्यासाठी संचालक कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांनी या कंपन्यांचे शेअर खरेदी करावे यासाठी लहान-मोठ्या गावात सभा, मेळावे घेतले जात असून, कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेअर घेण्यासाठी विनवणी करीत आहेत.

१३४३ लोकसंख्येच्या देवधरी येथे राज्यातील पहिल्या आदिवासी सहकारी सूत गिरणीची मुहूर्तमेढ दोन वर्षांपूर्वी रोवली. त्याच देवधरी येथे एक शेती कंपनी प्रकल्प येऊ घातला आहे. आठशे लोकसंख्येच्या आठमुरडीतही शेती कंपनी स्थापन झाली असून शेतकरी भागधारकांची जुळवाजुळव सुरू आहे. ही दोन्ही आदिवासी गावे असून देवधरी राष्ट्रीय महामार्गावर तर आठमुरडी आडवळणावरील गाव आहे. कळमच्या दहा युवक-युवतींनी स्थापन केलेल्या शेतकी कंपनीने पहिल्याच वर्षी सव्वा कोटी रुपयांचा व्यवसाय मिळविलेला असल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे. शेतकऱ्यांना शेअर घेण्यासाठी कंपनी प्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. अनेक गावात शेतमालावर आधारित कंपन्या स्थापन करण्याकरिता शेतकऱ्यांची सुशिक्षित तरुण मुले प्रयत्नरत आहेत. त्यामुळे शेतीतील मरगळीसह तोटाही दूर होण्याची आशा वाढली आहे. कृषी कंपन्यांमुळे बाजार समित्यांपुढेही आव्हान उभे राहिले असून, त्यांनाही कारभारात सुधारणा कराव्या लागणार आहेत. बाजार समितीचे मुख्य उत्पन्न कापूस विक्रीवर मिळणारा सेस आहे. सध्या तरी या क्षेत्रात शेती कंपन्या उतरलेल्या नाहीत. पुढे कापूस क्षेत्रातही अशा कंपन्या उतरल्यास किंवा खासगी बाजार समित्या स्थापन झाल्यास बाजार समितीपुढे मोठे आव्हान उभे राहिलेले दिसेल.