शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

बीपीएल आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसहाय्य

By admin | Updated: June 8, 2015 00:03 IST

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील दारिद्र्यरषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध...

जिल्हानिहाय आराखडा : ७५ कोटींच्या निधीस शासनाची मान्यतादारव्हा : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील दारिद्र्यरषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरिता ७५ कोटी रुपयांच्या निधीस शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना दारिद्र्य रेशेवर आणण्यासाठी ५५ कोटी ३८ लाख २८ हजार, फलोत्पादन व इतर पिकांसाठी तुषार व ठिबक सिंचन या योजनेसाठी १३ लाख ५८ हजार रुपयांचा निधी टीएसपीअंतर्गत तर ओटीएसपीअंतर्गत १९ कोटी ४९ लाख १४ हजार असा एकूण ७५ कोटी एक लाख १६ हजाराच्या निधीच्या कार्यक्रमास शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत नवीन विहीर, जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अवजारे, शेतीची सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईप लाईन, पंपसेट, शेततळे, परसबाग, ठिबक संच, तुषार सिंचन संच अशा घटकांचा समावेश असून त्याकरिता बाबनिहाय अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा विस्तार व फलोत्पादन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये या योजनेचा गरजेनुरूप अंतर्भाव करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थी निवडताना महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभ दिलेल्या लाभधारकांची यादी जिल्हा परिषद, तालुका कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय व प्रकल्प अधिकारी कार्यालयात लावण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)विकासासाठी प्रयत्नदारिद्र्यरेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा शेतकऱ्यांचा शेतीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा, हा या मागील शासनाचा हेतू आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम दिसून येईल. विशेषत: आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ही योजना अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात अशाप्रकारच्या शासनाच्या योजना प्रामाणिकपणे राबविल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगल्या प्रकारे सुधारणा होऊन शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.