शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

बीपीएल आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसहाय्य

By admin | Updated: June 8, 2015 00:03 IST

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील दारिद्र्यरषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध...

जिल्हानिहाय आराखडा : ७५ कोटींच्या निधीस शासनाची मान्यतादारव्हा : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील दारिद्र्यरषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरिता ७५ कोटी रुपयांच्या निधीस शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना दारिद्र्य रेशेवर आणण्यासाठी ५५ कोटी ३८ लाख २८ हजार, फलोत्पादन व इतर पिकांसाठी तुषार व ठिबक सिंचन या योजनेसाठी १३ लाख ५८ हजार रुपयांचा निधी टीएसपीअंतर्गत तर ओटीएसपीअंतर्गत १९ कोटी ४९ लाख १४ हजार असा एकूण ७५ कोटी एक लाख १६ हजाराच्या निधीच्या कार्यक्रमास शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत नवीन विहीर, जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अवजारे, शेतीची सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईप लाईन, पंपसेट, शेततळे, परसबाग, ठिबक संच, तुषार सिंचन संच अशा घटकांचा समावेश असून त्याकरिता बाबनिहाय अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा विस्तार व फलोत्पादन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये या योजनेचा गरजेनुरूप अंतर्भाव करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थी निवडताना महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभ दिलेल्या लाभधारकांची यादी जिल्हा परिषद, तालुका कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय व प्रकल्प अधिकारी कार्यालयात लावण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)विकासासाठी प्रयत्नदारिद्र्यरेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा शेतकऱ्यांचा शेतीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा, हा या मागील शासनाचा हेतू आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम दिसून येईल. विशेषत: आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ही योजना अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात अशाप्रकारच्या शासनाच्या योजना प्रामाणिकपणे राबविल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगल्या प्रकारे सुधारणा होऊन शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.