शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

जिल्हा परिषदेत प्रथमच आक्रमक विरोधक

By admin | Updated: March 23, 2017 00:12 IST

जिल्हा परिषदेत यावेळी प्रथमच कधी नव्हे एवढे आक्रमक विरोधक दिसणार आहे.

सत्ताधाऱ्यांची कसोटी : शिवसेना सदस्यांना सत्ता न मिळाल्याचे शल्य कायम टोचत राहणार यवतमाळ : जिल्हा परिषदेत यावेळी प्रथमच कधी नव्हे एवढे आक्रमक विरोधक दिसणार आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. आत्तापर्यंत बहुतांशवेळा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. कालपर्यंतही याच दोन पक्षांचे वर्चस्व कायम होते. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपाने या दोन्ही पक्षांपेक्षा जादा जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेवर आत्ता युतीची सत्ता येणार, असे वाटत असतानाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एका रात्रीतून सारेच समीकरण बिघडले. यातून कमी जागा जिंकूनही काँग्रेसला आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीलाही सत्तेत सहभागाची संधी मिळाली. सत्ता स्थापनेचे समीकरण जवळपास जुळल्यात जमा असताना सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने उपाध्यक्षपद पदरात पाडून जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या परिघात प्रथमच प्रवेश केला आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणातून अखेर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन झाली. मात्र सर्वात मोठा पक्ष असलेला शिवसेना सत्तेबाहेर फेकला गेल्याने त्यांच्या सदस्यांना शल्य टोचत आहे. हे शल्यच त्यांना आक्रमक विरोधक म्हणून जिल्हा परिषदेत नवीन ओळख मिळवून देण्याची शक्यता आहे. जवळ आलेली सत्ता ऐनवेळी दुरावल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंगळवारीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रचंड घोषणाबाजी करून त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. तेथेच भाजपाचे कार्यकर्तेही आक्रमक होते. यातून या दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात जिल्हा परिषदेत खटके उडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यात शिवसेना आधीच आक्रमक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांचे सदस्य खरच किती आक्रमक होतात, हे आगामी काळात जिल्हावासीयांना कळणार आहे. (शहर प्रतिनिधी)