शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

सासूच्या खुनानंतर सुनेने जाळून घेतले

By admin | Updated: August 12, 2014 23:59 IST

जिल्ह्यात गत २४ तासात दोन विधवा महिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह दडपण्यात आला होता. या दोनही खुनामागील गूढ कायम आहे. दरम्यान कळंब तालुक्याच्या

दोन विधवांच्या खुनाचे गूढ कायम : मोबाईलवर तपास केंद्रितवणी/कळंब : जिल्ह्यात गत २४ तासात दोन विधवा महिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह दडपण्यात आला होता. या दोनही खुनामागील गूढ कायम आहे. दरम्यान कळंब तालुक्याच्या कान्होली येथे सासूच्या खुनाच्या घटनेनंतर मंगळवारी दुपारी तिच्या सुनेने घरातच जाळून घेतले. ती मृत्यूशी झुंज देत आहे. कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत कान्होली येथे सुमन महादेव राऊत (५७) या महिलेचा खून करून प्रेत शेतात अर्धवट स्थितीत पुरण्यात आले होते. या घटनेचा तपास सुरू असतानाच सदर महिलेची सून शुभांगी संदीप राऊत (३०) हिने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ९० टक्के जळालेल्या अवस्थेत तिला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अस्पष्ट आहे. सोमवारी खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर कळंब पोलिसांनी मृत महिला सुमन हिचा मुलगा संदीप व सून शुभांगी यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते. सायंकाळपर्यंत बसवून ठेवून नंतर सोडून देण्यात आले. याच घटनेवरून पती-पत्नीत खटका उडाला असावा व त्यातूनच शुभांगीने पेटवून घेतले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. राऊत कुटुंबीय एकत्रच राहत असले तरी सून व सासू यांच्यात गेल्या चार वर्षांपासून अबोला असल्याचे गावात सांगितले जाते. शुभांगीचे माहेरही कान्होली गावातच आहे. संदीपकडे स्वत:ची शेती नाही. तो कष्टाळू आहे. दरवर्षी मक्त्याने शेती करायचा. यावर्षीही त्याने पेंदोर यांची शेती मक्त्याने केली होती. याच शेतीवर ८ आॅगस्ट रोजी शुभांगी आणि सासू सुमन सोबत गेल्या होत्या. मात्र परतताना केवळ शुभांगीच घरी आली. सासूला चकव्याने जंगलात नेले असावे, अशी बतावणी तिने केली. त्यानंतर संदीप व गावकऱ्यांनी सुमनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कळंब पोलीस ठाण्यातही सुमन राऊत यांच्या बेपत्ता होण्याची फिर्याद देण्यात आली होती. दरम्यान, एका शेतात सुमनचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या खुनामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.वणी येथील साईनगरीत कल्पना जोनलवार या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह दिवाणमध्ये लपविण्यात आला होता. या खुनामागील रहस्यही अद्याप उलगडलेले नाही. कल्पना यांचा मोबाईल बेपत्ता आहे. त्याद्वारेच सुगावा लागू शकेल, म्हणून पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे स्वत: वणीत तळ ठोकून आहेत. घटनास्थळावरील स्थिती पाहता मारेकरी कल्पना यांच्या संमतीनेच घरात आला असावा, तो त्यांचाच कुणी निकटवर्तीय असावा, असा संशय पोलिसांना आहे. कल्पना यांचा मुलगा मध्य प्रदेशात गेला. ९ आॅगस्टला सायंकाळी त्याचे आईसोबत मोबाईलवर बोलणेही झाले होते. मात्र खुनानंतर मोबाईलच बेपत्ता आहे. यातील मारेकरी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास वणीचे ठाणेदार गुलाब वाघ यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)