शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सासूच्या खुनानंतर सुनेने जाळून घेतले

By admin | Updated: August 12, 2014 23:59 IST

जिल्ह्यात गत २४ तासात दोन विधवा महिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह दडपण्यात आला होता. या दोनही खुनामागील गूढ कायम आहे. दरम्यान कळंब तालुक्याच्या

दोन विधवांच्या खुनाचे गूढ कायम : मोबाईलवर तपास केंद्रितवणी/कळंब : जिल्ह्यात गत २४ तासात दोन विधवा महिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह दडपण्यात आला होता. या दोनही खुनामागील गूढ कायम आहे. दरम्यान कळंब तालुक्याच्या कान्होली येथे सासूच्या खुनाच्या घटनेनंतर मंगळवारी दुपारी तिच्या सुनेने घरातच जाळून घेतले. ती मृत्यूशी झुंज देत आहे. कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत कान्होली येथे सुमन महादेव राऊत (५७) या महिलेचा खून करून प्रेत शेतात अर्धवट स्थितीत पुरण्यात आले होते. या घटनेचा तपास सुरू असतानाच सदर महिलेची सून शुभांगी संदीप राऊत (३०) हिने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ९० टक्के जळालेल्या अवस्थेत तिला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अस्पष्ट आहे. सोमवारी खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर कळंब पोलिसांनी मृत महिला सुमन हिचा मुलगा संदीप व सून शुभांगी यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते. सायंकाळपर्यंत बसवून ठेवून नंतर सोडून देण्यात आले. याच घटनेवरून पती-पत्नीत खटका उडाला असावा व त्यातूनच शुभांगीने पेटवून घेतले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. राऊत कुटुंबीय एकत्रच राहत असले तरी सून व सासू यांच्यात गेल्या चार वर्षांपासून अबोला असल्याचे गावात सांगितले जाते. शुभांगीचे माहेरही कान्होली गावातच आहे. संदीपकडे स्वत:ची शेती नाही. तो कष्टाळू आहे. दरवर्षी मक्त्याने शेती करायचा. यावर्षीही त्याने पेंदोर यांची शेती मक्त्याने केली होती. याच शेतीवर ८ आॅगस्ट रोजी शुभांगी आणि सासू सुमन सोबत गेल्या होत्या. मात्र परतताना केवळ शुभांगीच घरी आली. सासूला चकव्याने जंगलात नेले असावे, अशी बतावणी तिने केली. त्यानंतर संदीप व गावकऱ्यांनी सुमनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कळंब पोलीस ठाण्यातही सुमन राऊत यांच्या बेपत्ता होण्याची फिर्याद देण्यात आली होती. दरम्यान, एका शेतात सुमनचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या खुनामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.वणी येथील साईनगरीत कल्पना जोनलवार या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह दिवाणमध्ये लपविण्यात आला होता. या खुनामागील रहस्यही अद्याप उलगडलेले नाही. कल्पना यांचा मोबाईल बेपत्ता आहे. त्याद्वारेच सुगावा लागू शकेल, म्हणून पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे स्वत: वणीत तळ ठोकून आहेत. घटनास्थळावरील स्थिती पाहता मारेकरी कल्पना यांच्या संमतीनेच घरात आला असावा, तो त्यांचाच कुणी निकटवर्तीय असावा, असा संशय पोलिसांना आहे. कल्पना यांचा मुलगा मध्य प्रदेशात गेला. ९ आॅगस्टला सायंकाळी त्याचे आईसोबत मोबाईलवर बोलणेही झाले होते. मात्र खुनानंतर मोबाईलच बेपत्ता आहे. यातील मारेकरी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास वणीचे ठाणेदार गुलाब वाघ यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)