शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तपानंतरही घरकुलापासून वंचित

By admin | Updated: July 9, 2017 00:53 IST

१२ वर्षांपूर्वी धावंडा नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेल्या अंजनाबाईला एक तपानंतरही हक्काचे घरकूल मिळाले नाही.

वृद्ध अंजनाबाईची खंत : धावंडा नदीच्या पूर प्रलयाला १२ वर्षे पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : १२ वर्षांपूर्वी धावंडा नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेल्या अंजनाबाईला एक तपानंतरही हक्काचे घरकूल मिळाले नाही. परिणामी प्रलयातून जिवंत राहणे हे सुदैव नसून मोठे दुर्दैव ठरल्याची खंत ८६ वर्षीय अंजनाबाई सोनोने यांनी व्यक्त केली. १२ वर्षांपूर्वी ९ जुलै रोजी धावंडा नदीला महापूर आला. या पुरात संजय पांडुरंग सोनोने, त्यांची पत्नी मीना, मुलगी भाग्यश्री व तेजस्विनी व मुलगा वैभव, असे पाच जण वाहून गेले. याशिवाय शशिकला नवरे, वासुदेव नवरे, शांता शिंदे, बाली शिंदे, श्याम पाचंगे, दिवाकर शेलकर, पंचीबाई राठोड, प्रभाकर विलायते व स्वाती विलायते हेसुद्धा पुरात वाहून गेले होते. पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटल्याने धावंडा नदीची पाणी पातळी वाढून हा महापूर आला होता. त्यात सोनोने कुटुंबातील पाच जणांसह १२ जणांचे निष्पाप बळी गेले. या महापुरातून अंजनाबाई बचावल्या होत्या. त्यांच्या डोळ्यादेखत पुराने मुलगा, सून व तीन नातवंडांना गिळंकृत केले होते. त्यांचे घरही जमीनदोस्त झाले होते. पुरानंतर शासन, विविध सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी मलमपट्टी केली. मात्र त्यापैकी अनेकांना अद्यापही हक्काचे घरकूल मिळू शकले नाही. अंजनाबाईही अंध मुलीसह एका झोपडीत वास्तव करून आहे. मोडक्या झोपड्यांमध्ये संसार पूरग्रस्तांनी धावंडा नदीकाठी मोडक्या झोपड्यात संसार थाटला. या परिसरात झाडेझुडपे वाढली असून सांडपाणी साचले आहे. विजेची सुविधा नाही. त्यामुळे रात्री किर्र.. अंधार असतो. या परिसरात कोणत्याच नागरी सुविधा नाही. वयोवृद्ध अंजनाबाई सोनोने आपल्या अंध अविवाहित मुलीसह याच परिसरात झोपडीमध्ये वास्तव्याला आहे. डोळे मिटण्यापूर्वी घरकूल मिळेल का, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.