शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

वेकोलिग्रस्त शेतकऱ्यांना अखेर आठ वर्षांनंतर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:39 IST

वेकोलिच्या बेलोरा-नायगाव डीप परियोजनेंतर्गत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागील आठ वर्षांपासून फरफट सुरू होती. न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. याची दखल घेत पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात वेकोलि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले.

ठळक मुद्देलेखी आश्वासन : बेलोरा-नायगाव प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वेकोलिच्या बेलोरा-नायगाव डीप परियोजनेंतर्गत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागील आठ वर्षांपासून फरफट सुरू होती. न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. याची दखल घेत पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात वेकोलि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली.वेस्टर्न कोल लिमिटेडच्या प्रबंधनाद्वारे वणी तालुक्यातील बेलोरा-नायगाव परियोजनेंतर्गत बेलोरा, बेलसनी, कुंभारी येथील २९२.२६ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण केले. मात्र या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा लाभ मिळाला नाही. अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू होता. सातत्याने पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यात येत नव्हती. स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत फार गंभीर नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च आंदोलनाचा निर्णय घेतला. अखेर वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी खडसावल्यानंतर मंगळवारी वेकोलिच्या भूराजस्व विभागाचे महाप्रबंधक आय.डी. येनकेन्नी, खनन मुख्य प्रबंधक परांजपे, वणी क्षेत्रीय योजना अधिकारी कुलकर्णी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. शेतकºयांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन घेतले. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रवीण रोगे, चंद्रकांत पिंपळकर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांना मोबदला व पुनर्वसन लाभ वाटप प्रक्रिया ९० दिवसांच्या आत सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर पप्पू पाटील भोयर यांच्या हस्ते मोसंबी ज्यूस पाजून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता झाली.

टॅग्स :StrikeसंपFarmer strikeशेतकरी संप