शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीचा खटाटोप

By admin | Updated: October 26, 2014 22:47 IST

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे

यवतमाळ : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे असले तरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत सुंदोपसुंदी त्यातील महत्वाचे कारण होय. आता पराभवाचे चिंतन करण्याऐवजी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी निवडण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काही ठराविक नेत्यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. राजकारणात दिग्गज असलेल्यांना त्यांच्या परंपरागत विरोधकांकडूनच मात मिळाली. यामुळे कुठलेही स्पष्टीकरण देण्याची सोय त्यांच्याजवळ नाही. प्रदीर्घ काळ सत्ता असूनही इतका दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांना कार्यकारिणी निवडण्याची आठवण झाली आहे. येथील नेते बरेचदा संघटनेच्या पुढे जाऊनही आपण आहोत, अशा तोऱ्यात वावरताना दिसले. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बैठकांमध्ये नेत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याच कार्यकर्त्यांची कशी मुसकटदाबी करता येईल याची व्युहरचना आखण्यातच नेते मंडळींचा वेळ खर्ची पडला. अशातच विधानसभा निवडणुका लागल्या आणि विरोधात असलेले परंपरागत स्पर्धक या काँग्रेस नेत्यांच्या पुढे निघून गेले. आज चारीमुंड्या चित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांना कार्यकारिणीची आठवण झाली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदारांची बैठक झाली. कुणालाही याबाबत सूचना न देताच जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मर्जीतील ठराविक कार्यकर्त्यांकडून प्रस्तावही मागविण्यात येत आहे. दोन दिवसात काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या इतिहासात प्रथमच कार्यकारिणी नसताना निवडणूक झाल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक काळात जिल्ह्याचे प्रभारी म्हणून डॉ.वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली होती. मात्र निवडणूक संपताच जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार सक्रिय झाले आहेत. त्यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संजय देशमुख यांनी काही निवडक सदस्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता कार्यकारिणी निवडतानाही या नेत्यांकडून गटबाजी व वशिलेबाजीला प्राधान्य दिले जात काय याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)