शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर मिळाली वनरक्षकाला बढती

By admin | Updated: August 13, 2015 03:02 IST

क-दोन नव्हे तर तब्बल ३३ वर्ष वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सेवा दिली. या सेवेचे फळ म्हणून वनपाल पदावर बढतीची आस होती.

यवतमाळ वनवृत्ताचा कारभार : ३३ वर्षांच्या सेवेचे असेही फळ लोकमतविशेषयवतमाळ : एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ वर्ष वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सेवा दिली. या सेवेचे फळ म्हणून वनपाल पदावर बढतीची आस होती. त्यासाठी बरीच धडपडही केली. प्रत्यक्षात बढती मिळतच नव्हती. अखेर एक दिवस बढतीचा आदेश घरी पोहोचला. मात्र आधल्या दिवशीच त्या वन कर्मचाऱ्याने जगाचा निरोप घेतला होता. एखाद्या कर्मचाऱ्याला चक्क मृत्यूनंतर बढती मिळत असेल तर त्याला कोणते दुदैव म्हणावे.वाय.आर. जोंधळे असे या वनरक्षकाचे नाव आहे. ते पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत बिटरगाव वन परिक्षेत्रात कार्यरत होते. ९ आॅगस्ट रोजी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० आॅगस्ट रोजी त्यांच्या घरी वनपाल पदावरील बढतीचा आदेश पोहोचला. आजारी असल्यामुळे दोन महिन्यांपासून ते रजेवर होते. जोंधळे यांची ३३ वर्षातील बहुतांश सेवा ही वन्यजीव विभागातच झाली आहे. वनपाल पदावरील बढतीच्या प्रतीक्षेत जोंधळे यांचा प्राण गेला. मात्र हयातीत त्यांना वन प्रशासनाने ही बढती दिली नाही. नियमानुसार दहा ते बारा वर्ष सेवा झाल्यानंतर पहिली बढती मिळणे बंधनकारक आहे. मात्र जोंधळे यांना बढती मिळविण्यासाठी तब्बल ३३ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. एकीकडे भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांना अगदी वेळेत बढत्या मिळत आहेत. विलंब झाल्यास या बढत्या मिळवून घेतल्या जातात. तर दुसरीकडे वन संरक्षणाचा पाया असलेल्या वनरक्षक-वनपालांना बढतीसाठी संपूर्ण हयात प्रतीक्षा करावी लागते. यवतमाळ वनवृत्ताच्या या तुघलकी कारभारावर वन वर्तुळात रोष व्यक्त केला जात आहे. या वनवृत्तात १६ वनरक्षकांना बढती देऊन वनपाल बनविले गेले. मात्र त्यांना नियुक्त्या देताना कुठे अन्याय तर कुठे सोईने आॅर्डर काढले गेले. गेली कित्येक वर्ष वन्यजीव विभागात सेवा देणाऱ्या वनरक्षकांना पदोन्नती देताना पुन्हा तेथेच नियुक्त्या दिल्या गेल्या. वास्तविक त्यांना वन्यजीव संरक्षणातून बाहेर काढून प्रादेशिक विभागात नियुक्त्या देणे अपेक्षित होते. मात्र त्यांचे कोणतेही लागेबांधे नसल्याने त्यांना पुन्हा जंगलातच ठेवले गेले. या उलट प्रादेशिक विभागात वनरक्षक असलेल्या कर्मचाऱ्यांना तेथेच किंचित फेरबदल करून पुन्हा नेमले गेले. गेली वर्षानुवर्षे प्रादेशिकमध्ये काम करणाऱ्या या वनरक्षकांना वन्यजीव विभागात पाठविण्याचा मुहूर्त केव्हा निघणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाच वनरक्षकांना अकोला प्रादेशिक विभागात जैसे थे ठेवले गेले हे विशेष. पैसा नाही आणि लग्गाही नाही यामुळे कित्येक वन कर्मचारी अनेक वर्षांपासून वन्यजीव विभागातच सेवा देत आहेत. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी कुणी गॉडफादर नाही. त्याशिवाय वन प्रशासन त्यांची दखल घेत नाही, हे विशेष. वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या वन कर्मचाऱ्यांना वन्यजीव विभागात नेमले जाऊ नये, असा शासनाचा आदेश आहे. मात्र तो पाळला जात नाही. सर्वत्र तीन वर्षात बदलीचा कायदा असताना वन्यजीव विभागाला तो लागू नाही का असा प्रश्न थेट वन मंत्रालयाला विचारला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)