शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

ज्ञानरचनावाद संकल्पनेने घोकमपट्टी बाद

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

ग्रामीण मुलांना मुक्त वातावरणात शिक्षण देण्यासाठी ज्ञानरचनावाद संकल्पनेचा यशस्वी प्रयोग केला जात आहे.

सातारातील कुमठेबी पॅटर्न : पोडावरच्या शाळांसाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम यवतमाळ : ग्रामीण मुलांना मुक्त वातावरणात शिक्षण देण्यासाठी ज्ञानरचनावाद संकल्पनेचा यशस्वी प्रयोग केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील ही संकल्पना दुर्गम भागातील पोडावरच्या शाळांसाठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १८ शाळांवर याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. रटाळ अध्यपनाला फाटा देत घोकमपट्टी बाद केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी पोड शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील ही यशस्वी संकल्पना आत्मसात करण्यासाठी वडगाव येथील केंद्रप्रमुख थोटे यांनी काही शिक्षकांसह कुमठेबीट येथील शाळेला भेट दिली. त्यानंतर हा प्रयोग वडगाव केंद्रातील शाळांमध्ये राबविण्यात आला. ज्ञानरचनावदामुळे विद्यार्थ्यांना पाठांतर करण्याची गरज नाही. शिवाय पारंपारिक फळा, खडू आणि छडी ही संकल्पनाच वर्गखोलीतून बाद होणार आहे. मुलांना प्रत्येक विषयांचा टास्क देऊन शिक्षक केवळ मार्गदर्शकांच्या भुमिके वावरणार आहे. ज्ञानरचना पध्दतीमुुळे विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच स्वयंअध्ययनाचा अनुभव घेता येणार आहे. हा प्रयोग यवतमाळ तालुक्यातील कारली येथील पोडावरच्या शाळेत करण्यात आला. त्याचे आश्चर्यकारक असे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी खुद्द अध्यक्ष फुपाटे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी या शाळेला भेट दिली. पहिलीतील मुले बेरीज, वजाबाकी करून दाखवित होते. त्यांना अक्षर ज्ञानही चांगले होते. वर्गात मुलांचा गोंधळ नव्हता प्रत्येक जण त्याला आवडेल त्या वस्तूंचा वापर करून ज्ञानार्जन करत होते. त्यामुळेच हा प्रयोग पहिल्या टप्प्यात सर्वच दुर्गम भागातील शाळांमध्ये राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी दिले. याची लागलीच अंमलबजावणीसुध्दा केली जात आहे. प्रशिक्षण झालेल्या शिक्षक व केंद्र प्रमुखांकडून इतरांना प्रशिक्षित केले जाणार आहे. ज्या शिक्षकांना नवीन काही करण्याची उर्मी आहे, अशांची निवड करून ही ज्ञानरचनावाद संकल्पना राबविली जाणार असल्याचे अध्यक्ष फुपाटे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण पध्दतीत ज्ञानरचनावादामुळे एक नवीन क्रांती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)