शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी परतफेड थांबविली

By admin | Updated: June 15, 2017 00:58 IST

कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे.

नवीन कर्जासाठी गर्दी : ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी फेडले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे. नवीन कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे एकच गर्दी केली आहे. मात्र आदेशच नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आत्तापर्यंत ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. पेरणीपूर्वी काही प्रमाणात शेतकरी कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांकडे जात होते. मध्यंतरी कर्जमाफीची घोषणा झाली. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची प्रक्रिया थांबविली आहे. नव्याने कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे धाव घेतली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. दररोज शेकडो शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ बँक कर्मचाऱ्यांवर ओढविली आहे. नवीन कर्जाचा तिढा शासनाने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने नवीन कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे. मात्र या संदर्भात अद्यापही बँकांना अधिकृत आदेश पोहोचले नाही. तसेच तातडीने दहा हजार रुपये कर्ज देण्यासंदर्भातही कोणतेही आदेश नाही. त्यामुळे नवीन कर्जाचा तिढा निर्माण झाल्याने पेरणीचे संकट ओढवले आहे.