शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी परतफेड थांबविली

By admin | Updated: June 15, 2017 00:58 IST

कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे.

नवीन कर्जासाठी गर्दी : ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी फेडले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे. नवीन कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे एकच गर्दी केली आहे. मात्र आदेशच नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आत्तापर्यंत ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. पेरणीपूर्वी काही प्रमाणात शेतकरी कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांकडे जात होते. मध्यंतरी कर्जमाफीची घोषणा झाली. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची प्रक्रिया थांबविली आहे. नव्याने कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे धाव घेतली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. दररोज शेकडो शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ बँक कर्मचाऱ्यांवर ओढविली आहे. नवीन कर्जाचा तिढा शासनाने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने नवीन कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे. मात्र या संदर्भात अद्यापही बँकांना अधिकृत आदेश पोहोचले नाही. तसेच तातडीने दहा हजार रुपये कर्ज देण्यासंदर्भातही कोणतेही आदेश नाही. त्यामुळे नवीन कर्जाचा तिढा निर्माण झाल्याने पेरणीचे संकट ओढवले आहे.