शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

अखेर अग्निशमन कराचे भूत बसले मानगुटीवर

By admin | Updated: June 27, 2015 00:39 IST

शहरातील सर्व मालमत्ताधारक नागरिकांच्या मानगुटीवर आता अग्निशमन कराचे भूत बसले आहे.

करदात्यांची बोळवण : सर्व अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडेचवणी : शहरातील सर्व मालमत्ताधारक नागरिकांच्या मानगुटीवर आता अग्निशमन कराचे भूत बसले आहे. सामान्य नागरिक सेवा घेत नसतानाही दरवर्षी हा कर भरावा लागणार आहे.येथील नगरपरिषदेने सन २०१६-२०२० या चार वर्षांसाठी मालमत्तेची कर आकारणी नव्याने केली. या कर आकारणीत मालमत्ता कर, वृक्ष कर, शिक्षण कर यासोबतच अग्निशमन कर लावण्यात आला. मात्र अग्निशमन सेवा ही सर्वांना कामी पडणारी सेवा नाही. या सेवेसाठी ज्यांनी सेवा वापरली, त्यांच्याकडून शुल्क घेतले जाते. त्यामुळे हा अग्निशमन कर सर्वांना सक्तीने लावू नये, असे नागरिकांचे म्हणणे होते. मात्र याविरोधात नागरिकांकडून तीव्र विरोध न झाल्याने व सभागृहातील पदाधिकारी व नगरसेवकांनीही या विरोधात आवाज न काढल्याने अखेर अग्निशमन कराचे भूत आता नागरिकांच्या मानगुटीवर बसले आहे.नगरपरिषदेने नव्याने केलेल्या कर आकारणीत अनेक नागरिकांचे कर अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आले. त्यामुळे हजारो नागरिकांनी या वाढीव कराच्या विरोधात आक्षेप नोंदविले. त्यासाठी सुणावणी ठेवण्यात आली. मात्र या सुनावणीत नागरिकांचे कोणतेही म्हणणे ऐकूनच घेण्यात आले नाही. त्यामुळे दोन-चार केसेस वगळता कुणाचाही कर कमी करण्यात आला नाही. उलट काही नागरिकांचा कर वाढविण्याचा विक्रम नगरपरिषदेने केला. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पुन्हा अपिलीय अधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपावर २२ जूनपासून सुनावणी सुरू झाली. २६ जूनला या सुनावणीचा शेवटचा दिवस होता. मात्र ही सुणावणीही केवळ ‘फार्स’ ठरली. अपिलीय सुनावणीतही नागरिकांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले जात नाही. अपील समितीमध्ये उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विरोधी गटनेता व बालकल्याण सभापती हे सदस्य आहे. सुनावणीला हे सर्व सदस्यही हजर नसतात. केवळ नगराध्यक्ष व मुख्याधिकारी व एखादा नगरसेवक उपस्थित असतो. तथापि संपूर्ण निर्णय मुख्याधिकारीच घेत असल्याचे दिसून आले. या सुनावणीत सोपस्कार म्हणून काहींचा कर १० किंवा २० टक्के कमी केला जात आहे. जुन्या करामध्ये तीन ते पाच पट कर वाढविल्याची उदाहरणे आहे. त्यांचा कर केवळ १०-२० टक्केच कमी करून त्यांची बोळवण केली जात. करांमध्ये सपाटून वाढ करायची व अपिलानंतर केवळ १० ते २० टक्के कर कमी करायचा, हा फंडा अवलंबिला गेला. (स्थानिक प्रतिनिधी)करदात्यांनी दाद कुणाकडे मागावी ?वाढविलेल्या करावर किंवा अग्निशमन करावर कोणताही नगरसेवक किंवा पदाधिकारी बोलायला तयार नाही. त्यामुळे नगरसेवक व पदाधिकारी नगरपरिषदेचे हितचिंतक की नागरिकांचे हितचिंतक, असा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी निवडून पाठविलेले प्रतिनिधीही नागरिकांचे वाली राहिले नसल्याने नागरिकांनी दाद कुणाकडे मागावी.