शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

९० हजार शेतकरी कर्जमाफीतून बाद

By admin | Updated: June 29, 2017 00:08 IST

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताच जिल्ह्यातील शेतकरी सुखावले होते.

जाचक अटी : २०१२ पूर्वीचे थकबाकीदार वगळले रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताच जिल्ह्यातील शेतकरी सुखावले होते. प्रत्यक्षात अध्यादेशातून यात खोडा घालण्यात आला आहे. २०१२-१३ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे १ एप्रिल २०१२ पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस मुकणार आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा ९० हजारांच्या घरात आहे. राज्य शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ जाहीर केली आहे. याचा अध्यादेश बुधवारी जिल्ह्यात धडकला. यामुळे कर्जमाफीस कुठले शेतकरी पात्र ठरतील याची उत्सुकता सहकार विभागासह बँकांनाही लागली होती. या अध्यादेशात अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. यामुळे ५० टक्के थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहे. २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात अपुरा पाऊस पडला. रबी हंगामातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे राज्यातील जिल्ह्यांची पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी आली. यामुळे १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरणार असल्याचा उल्लेख राज्य शासनाच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. शासनाचे कार्यासन अधिकारी दीपक राणे यांनी २८ जून २०१७ रोजी हे परिपत्रक जाहीर केले. यापूर्वी २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. २००९ मध्ये राज्य शासनाने व्याज माफीची घोषणा केली. यामध्ये दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले होते. तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम स्वत: भरायची होती. यानंतर २५ टक्के माफी अथवा २० हजारांची मदत केंद्र शासन देणार होते. मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम भरताच आली नाही. यामुळे या शेतकऱ्यांकडे आजही थकीत कर्ज कायम आहे. या शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे दिलासा मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात राज्य शासनाच्या अध्यादेशात २०१२ ते २०१६ पर्यंतचेच थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस पात्र राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे ५० टक्के शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहे. २००८ ते २०१२ या वर्षात शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. हे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. जिल्हा बँकेचा हा आकडा ९० हजार शेतकऱ्यांच्या घरात आहे. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात २०१२ ते २०१६ पर्यंतचीच कर्जमाफी पात्र ठरविली आहे. प्रत्यक्षात २०१२ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा ९० हजारांच्या घरात आहे. यामुळे थकीत ५० टक्के शेतकरी कर्जमाफीतून बाद होतील. - अविनाश सिंघम, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ