शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

९० हजार शेतकरी कर्जमाफीतून बाद

By admin | Updated: June 29, 2017 00:08 IST

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताच जिल्ह्यातील शेतकरी सुखावले होते.

जाचक अटी : २०१२ पूर्वीचे थकबाकीदार वगळले रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताच जिल्ह्यातील शेतकरी सुखावले होते. प्रत्यक्षात अध्यादेशातून यात खोडा घालण्यात आला आहे. २०१२-१३ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे १ एप्रिल २०१२ पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस मुकणार आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा ९० हजारांच्या घरात आहे. राज्य शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ जाहीर केली आहे. याचा अध्यादेश बुधवारी जिल्ह्यात धडकला. यामुळे कर्जमाफीस कुठले शेतकरी पात्र ठरतील याची उत्सुकता सहकार विभागासह बँकांनाही लागली होती. या अध्यादेशात अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. यामुळे ५० टक्के थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहे. २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात अपुरा पाऊस पडला. रबी हंगामातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे राज्यातील जिल्ह्यांची पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी आली. यामुळे १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरणार असल्याचा उल्लेख राज्य शासनाच्या अध्यादेशात करण्यात आला आहे. शासनाचे कार्यासन अधिकारी दीपक राणे यांनी २८ जून २०१७ रोजी हे परिपत्रक जाहीर केले. यापूर्वी २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. २००९ मध्ये राज्य शासनाने व्याज माफीची घोषणा केली. यामध्ये दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले होते. तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम स्वत: भरायची होती. यानंतर २५ टक्के माफी अथवा २० हजारांची मदत केंद्र शासन देणार होते. मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम भरताच आली नाही. यामुळे या शेतकऱ्यांकडे आजही थकीत कर्ज कायम आहे. या शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे दिलासा मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात राज्य शासनाच्या अध्यादेशात २०१२ ते २०१६ पर्यंतचेच थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस पात्र राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे ५० टक्के शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहे. २००८ ते २०१२ या वर्षात शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. हे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. जिल्हा बँकेचा हा आकडा ९० हजार शेतकऱ्यांच्या घरात आहे. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात २०१२ ते २०१६ पर्यंतचीच कर्जमाफी पात्र ठरविली आहे. प्रत्यक्षात २०१२ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा ९० हजारांच्या घरात आहे. यामुळे थकीत ५० टक्के शेतकरी कर्जमाफीतून बाद होतील. - अविनाश सिंघम, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ