शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

११ महिन्यानंतर कामाला मुहूर्त

By admin | Updated: January 31, 2015 00:21 IST

येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते.

घोन्सा : येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते. मात्र या पुलााच्या कामाला आत्तापर्यंत मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर तब्बल ११ महिन्यानंतर एकदाचा या पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला आहे.दहेगाव येथील मुख्य मार्गावर असलेल्या नाल्यावर अद्याप पूल नाही. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी वारंवार संबधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचा सतत पाठपुरावाही करण्यात आला. तथापि प्रत्येक राजकीय पक्षांनी या समस्येचा लाभ घेत केवळ आपली पोळी शेकून घेतली आणि समस्या ‘जैसे थे’च राहिली. परिणामी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. लोकप्रतिनिधींविषयी त्यांच्या मनात आक्रोष निर्माण झाला होता. आश्वासनांची त्यांना सवय झाली होती. यानंतर लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच या पुलाच्या बांधकामाचे कामाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी जवळपास ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. तथापि प्रत्यक्षात पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली नव्हती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे काम खोळंबले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक आली. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेच नाही. विधानसभा निवडणूक आटोपल्यांतरही पुलाच्या भूमिपूजनाचे प्रत्यक्ष कामात रूपांतर झालेच नाही. पुलाचे बांधकाम सुरू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. आता तब्बल ११ महिन्यानंतर या कामाला मुहूर्त सापडला आहे. नुकतेच या पुलाचे बांधकाम सुरू झाल्याचे दिसत आहे. या नाल्यावर पूल नसल्याने दहेगाववासीयांची मोठी पंचाईत होते. पावसाळ्यातील चार महिने या नाल्यावरून मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. पावसाळ्यात या नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यावेळी या गावाचा संपर्क तुटतो. पुलावरून पाणी वाहात असल्यास बाहेरगावी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर ओसरेपर्यंत वाट बघावी लागते. त्यांना घरीच राहावे लागते. पावसाळ्यात या गावातील एखाद्याची प्रकृती बिघडली, तरी नाल्यावरील पूर ओसरण्याची वाट बघावी लागते. त्यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. गावकऱ्यांच्या दृष्टीने पूल नसणे ही मोठी समस्या होती. या पुलाच्या कामाविषयी अधिकारी व कंत्राटदारांना माहिती विचारली असता त्यांनी काही तांत्रिक अडचण व गावातील समस्या अशीच कारणे सांगून हे काम आजपर्यंत पुढे ढकलले होते. आता पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)