शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

११ महिन्यानंतर कामाला मुहूर्त

By admin | Updated: January 31, 2015 00:21 IST

येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते.

घोन्सा : येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते. मात्र या पुलााच्या कामाला आत्तापर्यंत मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर तब्बल ११ महिन्यानंतर एकदाचा या पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला आहे.दहेगाव येथील मुख्य मार्गावर असलेल्या नाल्यावर अद्याप पूल नाही. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी वारंवार संबधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचा सतत पाठपुरावाही करण्यात आला. तथापि प्रत्येक राजकीय पक्षांनी या समस्येचा लाभ घेत केवळ आपली पोळी शेकून घेतली आणि समस्या ‘जैसे थे’च राहिली. परिणामी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. लोकप्रतिनिधींविषयी त्यांच्या मनात आक्रोष निर्माण झाला होता. आश्वासनांची त्यांना सवय झाली होती. यानंतर लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच या पुलाच्या बांधकामाचे कामाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी जवळपास ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. तथापि प्रत्यक्षात पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली नव्हती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे काम खोळंबले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक आली. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेच नाही. विधानसभा निवडणूक आटोपल्यांतरही पुलाच्या भूमिपूजनाचे प्रत्यक्ष कामात रूपांतर झालेच नाही. पुलाचे बांधकाम सुरू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. आता तब्बल ११ महिन्यानंतर या कामाला मुहूर्त सापडला आहे. नुकतेच या पुलाचे बांधकाम सुरू झाल्याचे दिसत आहे. या नाल्यावर पूल नसल्याने दहेगाववासीयांची मोठी पंचाईत होते. पावसाळ्यातील चार महिने या नाल्यावरून मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. पावसाळ्यात या नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यावेळी या गावाचा संपर्क तुटतो. पुलावरून पाणी वाहात असल्यास बाहेरगावी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर ओसरेपर्यंत वाट बघावी लागते. त्यांना घरीच राहावे लागते. पावसाळ्यात या गावातील एखाद्याची प्रकृती बिघडली, तरी नाल्यावरील पूर ओसरण्याची वाट बघावी लागते. त्यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. गावकऱ्यांच्या दृष्टीने पूल नसणे ही मोठी समस्या होती. या पुलाच्या कामाविषयी अधिकारी व कंत्राटदारांना माहिती विचारली असता त्यांनी काही तांत्रिक अडचण व गावातील समस्या अशीच कारणे सांगून हे काम आजपर्यंत पुढे ढकलले होते. आता पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)