शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

१० दिवसानंतरही पोषण आहार नाही

By admin | Updated: July 6, 2015 02:33 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दहा दिवस होत असताना अद्यापही नेर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरू करण्यात आला नाही.

पांडुरंग भोयर सोनखासजिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दहा दिवस होत असताना अद्यापही नेर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागत आहे. पोषण आहाराचे साहित्यच नसल्याने विद्यार्थ्यांना आहार कसा द्यावा, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढावी, यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे पोषण आहारदेखील नियमित पुरविला जात नाही. त्यामुळे आहे ते विद्यार्थीदेखील या शाळांमधून बाहेर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. शाळांमधून शालेय पोषण आहारच दिला जात नसल्याने पालकवर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढावी तसेच त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे या हेतूने शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. परंतु या योजनेला नेर तालुक्यात हरताळ फसल्याचे चित्र आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा आहे तर खासगी ४२ आणि नगरपरिषदेच्या सात शाळा आहेत. २६ जूनला शाळा सुरू झाल्या आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश शाळेत पोषण आहारच दिल्या जात नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होणार आहे. या शाळांमध्ये शिकणारी जास्तीत जास्त मुलेही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळतो. आपला पाल्य शाळेत जेवत असल्यामुळे पालकही बिनधास्त असतात. परंतु आता पालकांना विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. विद्यार्थी शाळेतून उपाशीच घरी येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. काही शाळांशी संपर्क साधला असता शासनाकडून तांदूळाचा पुरवठाच झाला नसल्याचे सांगण्यात आले.