शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसानंतरही पोषण आहार नाही

By admin | Updated: July 6, 2015 02:33 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दहा दिवस होत असताना अद्यापही नेर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरू करण्यात आला नाही.

पांडुरंग भोयर सोनखासजिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दहा दिवस होत असताना अद्यापही नेर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागत आहे. पोषण आहाराचे साहित्यच नसल्याने विद्यार्थ्यांना आहार कसा द्यावा, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढावी, यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे पोषण आहारदेखील नियमित पुरविला जात नाही. त्यामुळे आहे ते विद्यार्थीदेखील या शाळांमधून बाहेर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. शाळांमधून शालेय पोषण आहारच दिला जात नसल्याने पालकवर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढावी तसेच त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे या हेतूने शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. परंतु या योजनेला नेर तालुक्यात हरताळ फसल्याचे चित्र आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा आहे तर खासगी ४२ आणि नगरपरिषदेच्या सात शाळा आहेत. २६ जूनला शाळा सुरू झाल्या आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश शाळेत पोषण आहारच दिल्या जात नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होणार आहे. या शाळांमध्ये शिकणारी जास्तीत जास्त मुलेही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळतो. आपला पाल्य शाळेत जेवत असल्यामुळे पालकही बिनधास्त असतात. परंतु आता पालकांना विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. विद्यार्थी शाळेतून उपाशीच घरी येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. काही शाळांशी संपर्क साधला असता शासनाकडून तांदूळाचा पुरवठाच झाला नसल्याचे सांगण्यात आले.