शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मताधिक्यात माघारलेल्या पदाधिकाऱ्यांना धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव पंचायत समिती गणातून आघाडी मिळवून दिली आहे.

ठळक मुद्देराळेगाव तालुका : राजकीय भविष्याची चिंता, पद जाण्याचीही भीती

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : विधानसभा निवडणुकीत राळेगाव तालुक्यात भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कामगिरी संमिश्र राहिली. याबाबतीत काही पदाधिकारी पास, काही नापास, तर काही चक्क वरपास झालेले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आता आगामी महत्त्वपूर्ण निवडणुकीत श्रेष्ठींकडून निश्चित दखल घेतल्या जाणार आहे. कामगिरीनुसार तिकीट व पद देण्याचे धोरण राहणार असल्याने अनेकजण धास्तावले आहे.भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव पंचायत समिती गणातून आघाडी मिळवून दिली आहे. सहकार आघाडी अध्यक्ष आशीष इंगोले यांनी पिंपरी, दुर्गमधून मोठी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे प्रीती संजय काकडे यांची वडकी जिल्हा परिषद गट, स्नेहा येनोरकर धानोरा पंचायत समिती गण यात भाजपला पिछाडी राहिल्याने त्यांचा मतदारांवरील प्रभाव घटल्याचे समोर आले आहे. राळेगाव तालुक्यात भाजपला केवळ एक हजार नऊ मतांची तेवढी आघाडी मिळाली आहे.काँग्रेसमध्ये स्वत: उमेदवार असलेले प्रा. वसंत पुरके यांनी स्वत:च्या आठमुर्डी गावात चांगले मताधिक्य घेतले. सहकार नेते अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्या सावनेर, राळेगाव तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे यांच्या सावरखेड येथे काँग्रेसला मताधिक्य आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे संचालक अरविंद वाढोणकर यांच्या वाढोणा बाजारामध्ये व पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे यांच्या वाढोणाबाजार गणात काँग्रेस माघारली आहे. पंचायत समिती उपसभापती नीलेश रोठे यांचे वरध गण, ज्योती खैरकार यांच्या वडकी गणात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. बाजार समिती उपसभापतींच्या वेडशी गावात, खविसं अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या पिंपरी दुर्ग आणि रावेरी सरपंच राजेंद्र तेलंगे यांच्या गावात काँग्रेसला हे नेते मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही. मात्र मताधिक्य देऊ न शकलेले कार्यकर्ते आणि विद्यमान पदाधिकाºयांमध्ये आता धाकधूक असल्याचे दिसून येत आहे.नगरपंचायतमध्ये उमेदवारीला धोकाराळेगावमध्ये दोन्ही पक्षांचे सर्वच महत्त्वपूर्ण नेते, पदाधिकारी वास्तव्यास आहे. त्यांचे सतत येथे राजकारण सुरू असते. भाजप तालुका अध्यक्ष बाळासाहेब कवीश्वर, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानंतर केवळ ५०४ मतांची आघाडी तेवढी भाजपला मिळाली आहे. राळेगाव शहरातील ११ मतदान केंद्रांपैकी नऊवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसने केवळ दोनवर आघाडी मिळविली. यावरून काँगे्रसचे नगरसेवक, भाजपचे असंतुष्ट नगरसेवक व पदाधिकारी आपआपल्या प्रभागात, क्षेत्रात बेदखल ठरले असल्याचे स्पष्ट झाले. आगामी नगरपंचायत निवडणुकीत या सर्व अयशस्वी नगरसेवकांच्या तिकिटा धोक्यात आल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण