शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

प्रतिज्ञापत्राला पर्याय स्वघोषणापत्राची घोषणा हवेतच

By admin | Updated: November 30, 2014 23:14 IST

विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार

गजानन अक्कलवार - कळंब विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार प्रतिज्ञापत्राऐवजी केवळ स्वघोषणापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु शासनाच्या या आदेशाकडे सर्वच ठिकाणी डोळेझाक केली जात आहे. महा-ईसेवा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्रात आजही प्रतिज्ञापत्रच भरुन घेतले जात आहे. विविध सेवा, सुविधा आणि दाखले मिळविण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यासाठी स्टॅम्प पेपर, तिकिटा लावाव्या लागत होत्या. अर्जनविसालाही लिखाणासाठी पैसे द्यावे लागत होते. तसेच अशिक्षित व्यक्तीला तर मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रतिज्ञापत्रावर तहसीलदारांची स्वाक्षरी मिळविण्यासाठी तासन्तास ताटकळत रहावे लागते. या कामासाठी संपूर्ण दिवसही खर्ची जात होता. त्यामुळेच शासनाने यावर मार्ग काढीत स्वघोषणा पत्र सादर करण्याचा आदेश निर्गमित केला. दरम्यानच्या काळात सुशिक्षित व्यक्तींनी स्वघोषणापत्राचा उपयोग केला. स्वघोषणापत्र अर्जाचाच एक भाग म्हणून विचारात घेतले जाणार आहे. तसे जाहीरही करण्यात आले होते. साध्या कागदावर स्वघोषणापत्र सादर करता येईल. यासाठी कुठल्याही न्यायिक कागदाची आवश्यकता राहणार नसल्याचे शासकीय आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार होता. परंतु सध्या स्वघोषणापत्राची अंमलबजावणीच होत नाही. जुन्या पद्धतीनेच प्रतिज्ञापत्र भरुन घेतले जात आहे. प्रतिज्ञापत्र नागरिक स्वेच्छापूर्वक व कायद्याचे भान ठेऊन सादर केले जाते. असे असले तरी सक्षम प्राधिकाऱ्यासमक्षच ते करावे लागते. त्यामुळे अर्जदाराला अनेकदा मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. परंतु स्वघोषणापत्र सादर करताना नागरिकांचा त्रास, वेळ आणि पैशाची बचत होणार होती. महा-ईसेवा केंद्र, सेतू केंद्र, ई-डिस्ट्रीक्ट इत्यादी प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा, दाखले, प्रमाणपत्रांसाठी स्वघोषणापत्र घेण्यात येईल, असे सांगण्यात आले मात्र उपयोग होत नाही.