शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

अधिकाऱ्यांची रोहयो आयुक्तांकडून कानउघाडणी

By admin | Updated: November 30, 2014 23:13 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच

उद्देशाला हरताळ : अकुशल कामांऐवजी दिला कुशल कामांवर भर यवतमाळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली असून ६०-४० चे प्रमाण व्यवस्थित पाळावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल आणि अकुशल खर्चाचे प्रमाण ६०-४० असे निश्चित केले आहे. मात्र अकुशल कामगारांना काम देताना यंत्रणा कमालीचे दुर्लक्ष करते. रोजगार हमी योजनेत काम करण्यासाठी ठेकेदारच पुढे येतात, हे अनेक प्रकरणांवरून उघड झाले आहे. काही ठिकाणी तर रोहयोच्या कामावर कागदोपत्री मजूर दाखवून मशीनद्वारेच कामे उरकण्यात आली. अकुशल कामगारांसाठी खोदकाम, मातीकाम यावर भर देणे आवश्यक आहे. आजच्या व्यवस्थेत अकुशल कामगारालाच रोजगारासाठी भटकावे लागते. त्याला केंद्रबिंदू ठेऊन रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. स्थलांतर करणारा कामगारांचा वर्ग हा अकुशल घटकातीलच आहे. या उलट स्थितीही कुशल कामगारांची आहे. त्याला सहज रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे रोहयोत निधीची तरतूद करताना अकुशल कामांवर अधिक म्हणजे ६० टक्के रक्कम खर्च व्हावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यासाठी देयके मंजूर करताना पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी, तहसीलदार या सर्वांचे नियंत्रण ठेवले. या दोनही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतरच ही देयके मंजूर होता. या अधिकाऱ्यांनी कुशल-अकुशलचे प्रमाण ठरल्याप्रमाणे कायम राखणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ७५ टक्के पेक्षा अधिक निधी हा कुशल कामावर खर्च झाल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे कुशल कामासाठी सर्वाधिक निधी वापरणाऱ्या जवळपास एक हजार ९५० ग्रामपंचायती आहे. ही बाब वित्तीय औचित्याला धरुन नसल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत जवळपास ७० कोटी रुपये अशा पद्धतीने खर्च झाले आहे. यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्तांनी आक्षेप घेतला असून जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांना स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)