शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

अधिकाऱ्यांची रोहयो आयुक्तांकडून कानउघाडणी

By admin | Updated: November 30, 2014 23:13 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच

उद्देशाला हरताळ : अकुशल कामांऐवजी दिला कुशल कामांवर भर यवतमाळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली असून ६०-४० चे प्रमाण व्यवस्थित पाळावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल आणि अकुशल खर्चाचे प्रमाण ६०-४० असे निश्चित केले आहे. मात्र अकुशल कामगारांना काम देताना यंत्रणा कमालीचे दुर्लक्ष करते. रोजगार हमी योजनेत काम करण्यासाठी ठेकेदारच पुढे येतात, हे अनेक प्रकरणांवरून उघड झाले आहे. काही ठिकाणी तर रोहयोच्या कामावर कागदोपत्री मजूर दाखवून मशीनद्वारेच कामे उरकण्यात आली. अकुशल कामगारांसाठी खोदकाम, मातीकाम यावर भर देणे आवश्यक आहे. आजच्या व्यवस्थेत अकुशल कामगारालाच रोजगारासाठी भटकावे लागते. त्याला केंद्रबिंदू ठेऊन रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. स्थलांतर करणारा कामगारांचा वर्ग हा अकुशल घटकातीलच आहे. या उलट स्थितीही कुशल कामगारांची आहे. त्याला सहज रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे रोहयोत निधीची तरतूद करताना अकुशल कामांवर अधिक म्हणजे ६० टक्के रक्कम खर्च व्हावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यासाठी देयके मंजूर करताना पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी, तहसीलदार या सर्वांचे नियंत्रण ठेवले. या दोनही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतरच ही देयके मंजूर होता. या अधिकाऱ्यांनी कुशल-अकुशलचे प्रमाण ठरल्याप्रमाणे कायम राखणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ७५ टक्के पेक्षा अधिक निधी हा कुशल कामावर खर्च झाल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे कुशल कामासाठी सर्वाधिक निधी वापरणाऱ्या जवळपास एक हजार ९५० ग्रामपंचायती आहे. ही बाब वित्तीय औचित्याला धरुन नसल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत जवळपास ७० कोटी रुपये अशा पद्धतीने खर्च झाले आहे. यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्तांनी आक्षेप घेतला असून जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांना स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)