शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ; शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:31 IST

शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल ३०० ते ४०० रूपयांनी वधारले. या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे.

ठळक मुद्दे ‘पणन’ची खरेदी ३५ हजार क्विंटलवरच थांबली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल ३०० ते ४०० रूपयांनी वधारले. या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे. कमी उत्पादन आणि कमी दरामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागत आहे.गतवर्षीच्या तुलनेल यावर्षी हमी दरात वाढ करून पणन महासंघाने कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यानंतरही खुल्या बाजारात कापसाचे दर हमी दराखाली घसरले. शुभारंभाला उघडलेले पणनचे केंद्र अपुरे होते. अनेकांना हे केंद्र उघडे आहे काय, तेथे कापूस कसा विकावा, याची माहितीच मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची हिंमत केली. मात्र शासकीय केंद्रात कापूस विकला, तर चुकारा कर्जापोटी कापला जाईल आणि चुकाराही उशिरा मिळेल, या भीतीने शेतकऱ्यांनी या केंद्रात कापूसच नेला नाही.राज्यात पणन महासंघाने ४३ केंद्र उघडले होते. त्यातील केवळ नऊ केंद्रावरच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. परिणामी आत्तापर्यंत केवळ ३५ हजार ७५८ क्विंटल कापसाचीच खरेदी पणन महासंघाला करता आली आहे.या स्थितीचा लाभ घेत राज्यातील व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी २३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. कमी दरात व्यापाऱ्यांनी हा कापूस खरेदी केला. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपल्यानंतर बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. हे दर क्विंटलमागे २०० ते ५०० रूपयांनी अधिक आहे. मात्र या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होणार आहे.जागतिक बाजारात रूपयाच्या दरात घसरण झाल्याने खुल्या बाजारात कापसाचे दर वधारण्यास सुरूवात झाली आहे. यासोबतच रूईच्या दरात मोठी सुधारणा झाली. क्विंटलला दोन हजार ५५० रूपयांचे दर मिळत आहे. सुताच्या दरामध्येही सुधारणा झाली. या सर्व बाबींचा परिणाम खुल्या बाजारात कापसाचे दर वधारण्यावर झाला आहे. सध्या कापसाला प्रती क्विंटल पाच हजार ८०० रूपयांचा दर मिळात आहे.यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये कापसाच्या दरात तेजी आहे. आता हे दर सहा हजार रुपये प्रती क्विंटलवर जातील काय, याची प्रतीक्षा कापसाचा संचय असणाऱ्या शेतकऱ्यांना आहे. तथापि कापूस साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र नगण्य आहे.निवडणुकीत दाक्षिणात्य कॉटन लॉबी वरचढनिवडणुकीच्या काळात दाक्षिणात्य कॉटन लॉबी दरवेळी वरचढ असते. ही लॉबी दर पाच वर्षानंतर वेगळी चाल खेळते. यावेळी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन या लॉबीने कमी दरात कापूस खरेदी करून त्याचा स्टॉक करून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी कापूस गाठी निर्यातीसाठी तयार ठेवल्या आहेत. या निर्यातीला मार्च अखेरीस परवानगी मिळाली. यामुळे कमी दरात खरेदी झालेल्या कापसाच्या गाठीवर व्यापाऱ्यांना बक्कळ नफा मिळण्यास मदत झाली आहे. यात शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे.सीसीआयने केंद्र गुंडाळलेखुल्या बाजारात हमी दरापेक्षा क्विंटलमागे ४०० रूपयांचे दर जादा आहे. यामुळे सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांयांनी पाठ फिरविली. या केंद्रांवर पाच हजार ४५० रूपये क्विंटल दराने कापूस खरेदी होत आहे. १० लाख क्विंटल कापूस सीसीआयने आत्तापर्यंत खरेदी केला आहे. दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कापूस विक्री सुरू केली. यामुळे सीसीआयचे केंद्र ओस पडले. परिणामी सीसीआयला आपले खरेदी केंद्र गुंडाळावे लागले.

टॅग्स :cottonकापूस