शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एडीओ, एसएओ, डीएचओ, सीएस जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:56 IST

जिल्ह्यात फवारणीतून विषबाधाने मृत्यू झालेल्या शेतकरी- शेतमजुरांचे प्रकरण राज्यात गाजत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा ठपका : फवारणीतून विषबाधा प्रकरण चार यंत्रणांवर शेकणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीतून विषबाधाने मृत्यू झालेल्या शेतकरी- शेतमजुरांचे प्रकरण राज्यात गाजत आहे. या धक्कादायक प्रकाराला जिल्हा कृषी विकास अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिला.जिल्हाधिकाºयांनी किटकनाशक कायदा १९६८ चा संदर्भ देत फवारणीतील विषबाधा प्रकरणाची माहिती देण्याची जबाबदारी या चार यंत्रणांची असल्याचे सांगितले. जुलै महिन्यापासून जिल्ह्यात विषबाधेचे प्रकरण घडत असताना याबद्दल कोणीच वाच्यता केली नाही. मी ११ सप्टेंबरला जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात दौरे केले. तेव्हासुध्दा याची माहिती दिली गेली नाही. पत्रकारांनी दूरध्वनीवरून विचारणा केल्यानंतर हे प्रकरण माहीत झाले, असे त्यांनी सांगितले.या प्रकरणाचे दोन प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केले असून अंतिम अहवाल येतया दोन दिवसात देणार आहे. मृत्यू झालेल्या शेतकºयाच्या मदतीचे प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाले असून १० शेतकरी व ६ शेतमजुरांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आत्तापर्यंत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४३८ रुग्ण दाखल झाले. सध्या २२ रूग्ण उपचार घेत असून त्यातील केवळ ३ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ग्रामीण रुग्णालयात एकूण ५८० रुग्ण दाखल झाले. आता केवळ ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात ६४ रुग्ण आले होते. यापैकी १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.फवारणीतून विषबाधा होत असल्याचे माहिती होताच २६ सप्टेंबरला आरोग्य, कृषी, महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त बैठक घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश दिले. बळीराजा चेतना अभियानातून ११ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या चार हजार ६४२ फवारणी किट्स पुरविण्यात आल्या. पोलीस, महसूल आणि कृषी विभागाकडून संयुक्तपणे कृषी केंद्राची तपासणी सुरू आहे. सात कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल केले असून पाच जाणांचा परवाना निलंबित केला, तर एका कृषी कें द्र चालकाला ताकीद दिल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.फवारणीतून मृत्यू झाल्याची माहिती न देणाºया दोन पोलीस पाटलांना निलंबित केल्याची माहिती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिली. तसेच यापुढे शासकीय रुग्णालयात आलेल्या विषबाधित रुग्णांची नोंद पोलीस घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी ‘एमएलसी’ रुग्णालयाच्या यंत्रणेकडून घेतली जात होती. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.तपासणीसाठी जिल्ह्याबाहेरील पथककृषी केंद्र तपासणीसाठी ४६ अधिकाºयांना एडीओ व एसएओंनी नियुक्त केले. तसेच जिल्ह्याबाहेरील गुणवत्ता नियंत्रण पथकांना चौकशीसाठी पाठवावे असा, प्रस्ताव कृषी सचिवांकडे सादर केल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.