शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अडाणमध्येही ठणठणाट

By admin | Updated: April 27, 2016 02:40 IST

अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे दारव्हा तालुक्यातील बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या नदीकाठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.

तीव्र पाणीटंचाई : नदी काठावरील गावकऱ्यांची भटकंतीबोरीअरब : अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे दारव्हा तालुक्यातील बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या नदीकाठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. जनावरांच्या पाण्यासाठी माणसांनासुद्धा दूरवर पायपिट करावी लागत आहे. गोकी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असताना शेतकऱ्यांना मिळणारे पाणी ३१ मार्च पूर्वीच बंद करून धरणात पाण्याची प्रचंड कपात केली आहे. त्यामुळे अडाण नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडले आहे व आता विहिरीसुद्धा ठणठण झाल्या आहेत. सद्यस्थितीत धरणात मुबलक व पुरेसा पाणीसाठी आहे. नदीत पाणी सोडण्यासाठी चारही गावच्या नागरिकांनी ग्रामपंचायत ठरावासह जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसांपूर्वीच निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन धरणातले पाणी नदीत सोडण्याचे निर्देश दिले. परंतु पाण्यासाठी लागणारे पैसे भरणार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या ग्रामीण जनतेजवळ एवढा पैसा नाही. यासाठी गावातील काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती व शेवटी पालकमंत्री यांच्याकडे हेलपाटे मारून थकले आहेत. प्रत्येक ठिकाणी केवळ आश्वासन मिळाले पाणी मात्र मिळाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संजय मानकर, ओमप्रकाश गुघाणे व बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या चारही गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)