शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

अडाणमध्येही ठणठणाट

By admin | Updated: April 27, 2016 02:40 IST

अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे दारव्हा तालुक्यातील बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या नदीकाठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.

तीव्र पाणीटंचाई : नदी काठावरील गावकऱ्यांची भटकंतीबोरीअरब : अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे दारव्हा तालुक्यातील बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या नदीकाठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. जनावरांच्या पाण्यासाठी माणसांनासुद्धा दूरवर पायपिट करावी लागत आहे. गोकी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असताना शेतकऱ्यांना मिळणारे पाणी ३१ मार्च पूर्वीच बंद करून धरणात पाण्याची प्रचंड कपात केली आहे. त्यामुळे अडाण नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडले आहे व आता विहिरीसुद्धा ठणठण झाल्या आहेत. सद्यस्थितीत धरणात मुबलक व पुरेसा पाणीसाठी आहे. नदीत पाणी सोडण्यासाठी चारही गावच्या नागरिकांनी ग्रामपंचायत ठरावासह जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसांपूर्वीच निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन धरणातले पाणी नदीत सोडण्याचे निर्देश दिले. परंतु पाण्यासाठी लागणारे पैसे भरणार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या ग्रामीण जनतेजवळ एवढा पैसा नाही. यासाठी गावातील काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती व शेवटी पालकमंत्री यांच्याकडे हेलपाटे मारून थकले आहेत. प्रत्येक ठिकाणी केवळ आश्वासन मिळाले पाणी मात्र मिळाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संजय मानकर, ओमप्रकाश गुघाणे व बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या चारही गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)