शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आठ नगरपरिषदांवर प्रशासक

By admin | Updated: July 5, 2014 23:47 IST

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राज्य शासनाने या नगराध्यक्षांंना मुदतवाढीचा निर्णय घेतला. कायदेशीर अडचणी आल्यामुळे शासनाने मुदतवाढीची

नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपला : २५ दिवसांच्या आत निवड प्रक्रिया यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राज्य शासनाने या नगराध्यक्षांंना मुदतवाढीचा निर्णय घेतला. कायदेशीर अडचणी आल्यामुळे शासनाने मुदतवाढीची अधिसूचना ३ जुलै रोजी रद्द केली. ५ जुलैपासून पूर्वीचाच अधिनियम लागू असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता आठ नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदभार उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे. यवतमाळ, वणी, पुसद या नगरपालिकेचा प्रभार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. दारव्हा, दिग्रस, आर्णी, उमरखेड, घाटंजी नगरपरिषदेचा प्रभार तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीवरून रणधुमाळी नको, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. मात्र त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाने हा निर्णय मागे घेत नगराध्यक्षांना दिलेली मुदतवाढ रद्द केली. त्यामुळे नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या पुढे नवीन नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया होईपर्यंत येथे प्रशासक कार्यरत राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून लवकरच नवीन नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडे २५ दिवसाचा अवधी आहे. तोपर्यंत नियुक्त केलेले उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहे. ६ जुलैचा रविवार आल्यामुळे ५ जुलैला दुपारनंतरच पदभार स्वीकारण्यात आला. नगरपंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ च्या कलम ६० अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सर्वांनाच तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेशही दिले आहे. आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)