शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत प्रशासन वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:01 IST

येथील नगरपरिषदेत भाजपाकडे संपूर्ण बहुमत असूनही त्यांना सत्ताधारी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविता येत नाही.

ठळक मुद्देलोकशाही दिनात तक्रार : सत्ताधारी सदस्य, पदाधिकारी अगतिक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपाकडे संपूर्ण बहुमत असूनही त्यांना सत्ताधारी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविता येत नाही. पदाधिकारी, सदस्यांवर प्रशासनच वरचढ ठरल्याचे दिसून येते. अनेकांनी तर आता नगरपरिषदेत येणेच सोडून दिले. मंत्री, आमदार असूनही प्रशासन सत्ताधाºयांचे ऐकत नसल्याने पालिका पदाधिकाºयांना चक्क लोकशाही दिनात तक्रारी कराव्या लागत आहेत.यापूर्वी नगरपरिषद प्रशासनावर पदाधिकाºयांची पूर्णत: पकड होती. त्याकाळात शहराचा सर्वच बाबतीत राज्य पातळीवर लौकिक होता. शहरातील विकास कामांसाठी व दैनंदिन उपाययोजनांकरिता नगरसेवक एकत्र येऊन प्रशासनावर दबाव टाकत होते. पालिकेत पक्षीय भेदाभेद अपवादानेच पहावयास मिळत होता. मात्र दुर्दैवाने सध्या नगरपरिषदेत प्रत्येक जण पक्षाचा मुखवटा घेऊन वावरत असल्याने प्रशासनाला वेळ मारून नेण्याची आयतीच संधी चालून आली. परिणामी सत्तेत असूनही पदाधिकारी व नगरसेवक अगदी छोट्याछोट्या बाबींसाठी अगतिक झाले आहेत.राणाप्रतापनगरमध्ये एका बिल्डरने खुल्या जागेत अतिक्रमण केले. त्याची तक्रार खुद्द एका सभापतींनी केली. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पालिका प्रशासनापुढे सादर केली. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. वारंवार विचारणा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी सभापतींना लोकशाही दिनात तक्रार करावी लागली. अनेक प्रकरणांमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा असाच अनुभव आहे.पालिकेत नगराध्यक्ष हे घटनात्मक पद शिवसेनेकडे, तर सभागृहात ठराव मंजूर करण्यासाठी लागणारे बहुमत भाजपाकडे आहे. उपाध्यक्ष ते विषय समिती सभापतीसुद्धा भाजपाचेच आहेत. त्यानंतरही येथील प्रशासन जुमानत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिवसेना, भाजप व काँग्रेस यांच्यातील अंतर्गत कुरघोडीचा लाभ प्रशासन घेत असून एकाही निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होत नाही. यातच वाढीव क्षेत्रातील नगरसेवक तर अद्याप प्रशासनाचा अभ्यासच करीत आहेत. प्रशासन प्रमुख आणि पदाधिकाºयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. अनेकदा तर वैयक्तीक पातळीवर आगपाखड केली जाते. तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.प्रशासन तासिकेवर, ज्येष्ठ गप्पचनगरपरिषद प्रशासनाचा कारभार घड्याळी तासिकेप्रमाणे सुरू असून कार्यालयीन वेळ संपताच काम थांबते. एक दोन विभाग प्रमुख प्रामाणिकपणे काम करण्यासाठी झटतात. मात्र त्यांना ज्येष्ठांकडून साथ मिळत नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभा असो वा इतरवेळी नगरसेवक व पदाधिकाºयांचा रोष सहन करणे एवढीच भूमिका या कर्तव्यतत्पर विभाग प्रमुखांची उरली आहे. जुन्या ज्येष्ठांनी गप्प बसून जे जे होते ते ते पहावे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागात बोंबाबोंग सुरू आहे. पदे रिक्त असल्याचे कारण पुढे करून प्रशासन प्रमुख जबाबदारी झटकत आहे. यामुळे सत्ताधाºयांची एकप्रकारे कोंडी झाली. पक्षाचेच कंत्राटदार काम करीत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत बोलण्याचीही सोय नाही.